Edelweiss Company : नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या एडलवाईज कंपनीचे शेअर्स घसरले...

या प्रकरणात कंपनीचं म्हणणं काय?


मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर (Nitin Desai Suicide Case) त्यांच्या आत्महत्येची कारणे समोर येत आहेत. एडलवाईज कंपनीकडून (Edelweiss Company) घेतलेले कर्ज फेडता न आल्याले कंपनीने नितीन देसाईंचा मानसिक छळ केला आणि त्यातूनच नितीन यांनी आत्महत्या केली, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांनीही एडलवाईज कंपनीवर नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.


नितीन देसाई कर्जाची रक्कम फेडण्यास तयार होते असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. नितीन देसाईंची पत्नी नेहा (Neha Desai) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस ग्रुपने कर्ज वसुलीसाठी नितीन देसाईंवर मानसिक दबाव टाकला, त्यामुळे त्यांनी हे मोठे पाऊल उचलले. कंपनीने तोडगा काढण्याचा प्रयत्न न करता केवळ त्रास दिला. नितीन देसाईंची पत्नी नेहा यांनी एडलवाईस ग्रुप आणि ईसीएल फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध लेखी तक्रार दिली होती आणि एफआयआर दाखल केला होता.



कंपनीचं म्हणणं काय ?


याप्रकरणी कंपनीच्या वक्तव्यानुसार, कलादिग्दर्शकावर कोणताही दबाव टाकण्यात आला नव्हता. कंपनीने जास्त व्याजही घेतले नव्हते असे निवेदन देखील कंपनीने प्रसिद्ध केले आहे. एडलवाईस कंपनीने स्टॉक मार्केटला (Stock Market) पत्र पाठवून सांगितले की, आर. बी. आय. (RBI) च्या नियमांनुसारच कायद्यामध्ये राहून कारवाई केली होती. कोणत्याही कर्जदारावर कर्ज वसुलीसाठी दबाव टाकला नाही. असं या पत्रात नमुद केलं आहे. मात्र, या प्रकरणानंतर एडलवाईस कंपनीचे शेअर्स ८५ पैशांनी घसरले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह