दिल्लीत हत्या, राजस्थानमध्ये पुरला मृतदेह, कसा शिजला कट?

सीआरपीएफमधील कॉन्स्टेबल पत्नीचा कट दिल्ली पोलिसांकडून उघड


भरतपूर : राजस्थानमधील सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल असलेल्या महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची दिल्लीमध्ये हत्या करून नंतर तिच्या प्रियकराने भरतपूरमधील बानसूर येथे खड्डा खोदून त्यात या व्यक्तीचा मृतदेह पुरल्याचा धक्कादायक उलगडा झाला. त्यातच या महिलेचा प्रियकरसुद्धा सीआरपीएफमध्ये असल्याचे समोर आल्याने संपूर्ण राजस्थान हादरले आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुळचा राजस्थानमधील असलेला संजय जाट हा पत्नी पूनम जाट हिच्यासह सध्या दिल्लीमध्ये राहत होता. त्याची पत्नी सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल पदावर तैनात आहे. तिचे बानसूर मधील रहिवासी आणि सीआरपीएफमध्येच असलेल्या रामप्रताप सोबत अफेअर सुरू होते. दरम्यान पती मारहाण करतो असे सांगून पूनम हिने प्रियकर राम प्रताप याला दिल्लीत बोलावून घेतले.


राम प्रताप हा दिल्लीला आल्यावर ३१ जुलै रोजी दोघांनीही मिळून संजय जाट याची हत्या केली. त्यानंतर राम प्रताप हा संजयचा मृतदेह घेऊन बानसूर येथे आला. तिथे त्याने आपल्या घराच्या जवळ असलेल्या जागेत खड्डा खोदून हा मृतदेह पुरून टाकला. या दरम्यान संजयच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची खबर पोलीस ठाण्यात दिली.


पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता त्यांना संजयची पत्नी पूनम हिच्यावर संशय आला. तिची कसून चौकशी केली असता सुरुवातीला तिने आडेवेडे घेतले. मात्र पोलिसी हिसका दाखवल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी ४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास राम प्रताप याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार नंतर पोलिसांनी मृतदेह शोधून काढला आणि या धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान