महाराष्ट्रातील तब्बल इतक्या स्थानकांचं रुपडं पालटणार, नव्या योजनेला सुरुवात

  68

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): महाराष्ट्रातील स्थानकं ४४ स्थानकं ही नव्या स्वरुपात आणि नव्या सुविधांसह प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते अमृत भारत स्थानक (Amruta Bharat Station Scheme) योजनेचा शुभारंभ झाला. या उपक्रमातंर्गत देशातील ५०८ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या स्थानकांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर यामध्ये महाराष्ट्रातील ४४ स्थानकांसाठी १६९६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.



राज्यातील पाच विभागातील स्थानकांचा समावेश


महाराष्ट्रातील एकूण पाच विभागातील स्थानकांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक छोट्या आणि मोठ्या स्थानकांचं रुपडं आता पालटणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर या विभागांचा समावेश करण्यात आला आहे. या पाच विभागांमध्ये खालील स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.


मुंबई विभाग - भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, इगतपुरी, वडाळा रोड, सँडहर्स्ट रोड

पुणे विभाग - कोल्हापूर, हडपसर, चिंचवड, सातारा, सांगली, कराड, तळेगाव, हातकणंगले, आकुर्डी, बारामती, देहूरोड, केडगाव, उरुळी, लोणंद, वाठार, फलटण, नागपूर विभाग - बल्हारशाह, बैतूल, चंद्रपूर, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, अमला, नरखेल, काटोल, पांढुर्णा, जुन्नरदेव, हिंगणघाट, मुलताई, घोराडोंगरी, गोधनी

भुसावळ विभाग - बडनेरा, मलकापूर, मूर्तिजापूर, नेपानगर, शेगाव, देवळाली, मनमाड, नांदुरा, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, धुळे, लासलगाव, रावेर, सावदा

सोलापूर विभाग - सोलापूर, कलबुर्गी, दौंड, पंढरपूर, वाडी, कुर्डुवाडी, अहमदनगर, कोपरगाव, लातूर, शहाबाद, बेलापूर, गंगापूर रोड, दुधनी, उस्मानाबाद, जेऊर
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Indian Railways Veg Meal Price : स्टेशनवर ७० तर ट्रेनमध्ये ८० रुपयांत मिळणार शाकाहारी जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

मुंबई : भारतात रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कोटींमध्ये आहे. दररोज कोट्यवधी लोक

शुभांशू शुक्लाने राकेश शर्माचा विक्रम मोडला, अंतराळात घालवले सर्वाधिक दिवस

नवी दिल्ली: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) एक आठवडा पूर्ण केला

हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे ६३ जणांचा मृत्यू, ४० बेपत्ता

राज्यात भूस्खलन, ढगफुटी आणि पुरामुळे भीषण परिस्थिती शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु

'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारत तीन देशांशी लढला

नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारत तीन देशांशी लढला. पाकिस्तानचे सैन्य तसेच चीन आणि तुर्कीयेच्या

IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड