Nashik Famers : कांदा लागवडीसाठी पाणी नसल्याने नाशिकमधील शेतकरी चिंताग्रस्त

बळीराजा बसला आहे आभाळाकडे डोळे लावून...


नाशिक : राज्यभरात सगळीकडे हाहाकार माजवल्यानंतर पावसाने आता विश्रांती घेतली आहे. मात्र नाशिकमध्ये अजूनही शेतकर्‍यांनी लावलेल्या कांद्याच्या पिकासाठी मुबलक प्रमाणात पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे (Nashik Onion Crop Crisis). पावसाची वाट पाहता पाहता दोन महिने उलटले तरीही नाशिकमधील चांदवड तालुक्यात डबके तुंबेल असा पाऊस झालेला नाही. इथला बळीराजा मात्र आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.


ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी चांदवड तालुक्यातील शेतकरी कांद्याच्या लागवडीत व्यस्त असतात. ही लागवड ऑगस्ट मध्ये करण्यासाठी त्यांची रोपे हे जूनच्या पहिल्या आठवड्यातच टाकावी लागतात. यंदा मात्र रोपे लावायला आली तरी पावसाअभावी कांद्याची लागवड करणे अशक्य झाले आहे. दुष्काळी चांदवडचे लाल कांदा हेच मुख्य नगदी पीक असून या लाल कांद्यावरच इथले सगळे अर्थकारण अवलंबून असते. मात्र या ठिकाणी पावसाने पाठ फिरविल्याने कांदा लागवडीस अडचणी येऊन येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.


पाऊस नसल्याने लाल कांद्याच्या लागवडीसाठी उशीर होणार आहे. अजून पंधरा ते वीस दिवस पाऊस आला नाही तर रोपेही वाया जातील अन् कांद्याचे गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे. त्यातच अगोदरच पेरणी केलेली मका, बाजरी, मुग, भुईमूग यांसारखी पिके देखील पाण्याअभावी सुकायला लागली आहेत. लाल कांद्याची लागवड उशिरा होणार असल्याने उन्हाळ्यात कांद्याचे भाव वाढतील यात शंका नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

 
Comments
Add Comment

Ashok Kharat case : पीडितांच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास होणार गुन्हा दाखल

मुंबई : अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

खरातच्या काळ्या कारनाम्याचा छडा आयपीएस तेजस्वी सातपुते लावणार, कोण आहेत आयपीएस तेजस्वी सातपुते?

नाशिक: महाराष्ट्रातील भोंदूबाबा म्हणजेच अशोक खरातचं काळं सत्य आता हळूहळू समोर येत आहे. स्वत:ला कॅप्टन आणि

नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, पतीकडून उकळले १० लाख रुपये; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

मुंबई: डोंबिवलीतून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रहिम पद्मसी,करीम जैन आणि करण जोशी अशा तीन नावांचा वापर

पुण्यातून मोठी अपडेट समोर; वसंत मोरेंना अटक होण्याची शक्यता

पुणे: पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते वसंत मोरे

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा

विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ घटणार; ९ आमदार निवृत्त होणार; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ दोनच जागा

मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर, आता विधान परिषदेतही विरोधकांचे संख्याबळ कमालीचे घटणार आहे.