Nashik Famers : कांदा लागवडीसाठी पाणी नसल्याने नाशिकमधील शेतकरी चिंताग्रस्त

बळीराजा बसला आहे आभाळाकडे डोळे लावून...


नाशिक : राज्यभरात सगळीकडे हाहाकार माजवल्यानंतर पावसाने आता विश्रांती घेतली आहे. मात्र नाशिकमध्ये अजूनही शेतकर्‍यांनी लावलेल्या कांद्याच्या पिकासाठी मुबलक प्रमाणात पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे (Nashik Onion Crop Crisis). पावसाची वाट पाहता पाहता दोन महिने उलटले तरीही नाशिकमधील चांदवड तालुक्यात डबके तुंबेल असा पाऊस झालेला नाही. इथला बळीराजा मात्र आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.


ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी चांदवड तालुक्यातील शेतकरी कांद्याच्या लागवडीत व्यस्त असतात. ही लागवड ऑगस्ट मध्ये करण्यासाठी त्यांची रोपे हे जूनच्या पहिल्या आठवड्यातच टाकावी लागतात. यंदा मात्र रोपे लावायला आली तरी पावसाअभावी कांद्याची लागवड करणे अशक्य झाले आहे. दुष्काळी चांदवडचे लाल कांदा हेच मुख्य नगदी पीक असून या लाल कांद्यावरच इथले सगळे अर्थकारण अवलंबून असते. मात्र या ठिकाणी पावसाने पाठ फिरविल्याने कांदा लागवडीस अडचणी येऊन येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.


पाऊस नसल्याने लाल कांद्याच्या लागवडीसाठी उशीर होणार आहे. अजून पंधरा ते वीस दिवस पाऊस आला नाही तर रोपेही वाया जातील अन् कांद्याचे गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे. त्यातच अगोदरच पेरणी केलेली मका, बाजरी, मुग, भुईमूग यांसारखी पिके देखील पाण्याअभावी सुकायला लागली आहेत. लाल कांद्याची लागवड उशिरा होणार असल्याने उन्हाळ्यात कांद्याचे भाव वाढतील यात शंका नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

 
Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

पुण्याच्या NDA मध्ये गूढ! एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू: नेमकं चाललंय तरी काय?

पुणे : पुण्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत

मुंबई पोलिसांचा दाऊदच्या टोळीला मोठा झटका! ड्रग्सचा कारखाना सांगलीत तर मास्टरमाइंड दुबईतून पकडला

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (गुन्हे शाखेने) एक मोठे ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय जाळे पकडून दाऊद