अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील

कोल्हापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य कष्टकरी, उपेक्षित समाजाशी नातं सांगणार असून त्यांचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ व साहित्यिक ॲड. कृष्णा पाटील यांनी केले.


ते प्रागतिक लेखक संघ, निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक व विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे, डॉ. बाबुराव गुरव, माजी आमदार राजीव आवळे, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत प्रा. टी. के. सरगर, कवी व लेखिका डॉ. शोभा चाळके, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी सन्मानाचा लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ समाजसेविका, धम्मलिपी प्रशिक्षिका, कवी आणि संपादिका छाया पाटील (मुंबई) आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते डॉ. नंदकुमार गोंधळी (कोल्हापूर) यांना मानाचा फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.


यावेळी तासगाव, जि. सांगलीचे माजी नगराध्यक्ष अमोल (नाना) शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर शाहीर दिपक गोठणेकर, किरण भिंगारदेवे, काळुराम लांडगे, लक्ष्मण माळी, रेवती आढाव, संग्राम मोरे, प्रा. डॉ. हाशिम वलांडकर, शंकर पुजारी, प्रा. डॉ. सविता व्हटकर, अभिजित पवार, सागर परीट, निलेश मोहिते, जयश्री चांदणे, रामचंद्र गुरव, सुनंदा दहातोंडे, डॉ. मानसी पवार, नंदू पवार, प्रा. विलास वैराळ, डॉ. शंकर अंदानी, विनोद त्रिभुवन गीता लळीत, विनोद आवळे, नथानियल शेलार, मुकुंद आव्हाड, डॉ. ज्ञानोबा कदम, डॉ. आनंद घन, मधुकर हुजरे, प्रा. डॉ. विजयकुमार सोन्नर, प्रा. अभय पाटील, छाया उंब्रजकर यादी मान्यवरांचा सन्मानचिन्ह व चार हजार रुपयांची पुस्तके देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


स्वागत व प्रास्ताविक अनिल म्हमाने यांनी, तर सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर आणि नामदेव मोरे यांनी केले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात