राज्यात कोरोनासह स्वाइन फ्लू व इन्फ्लुएंझाची रिएंट्री!

मुंबई-पुण्यात सर्वांधिक, 'या' जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय!


मुंबई : भारतात कोरोनाचा (Corona) धोका कमी झाल्यानंतर सर्वकाही सुरळती चालले असताना आता पुन्हा एकदा राज्यात रिएंट्री झाली आहे. (Re-entry of swine flu and influenza along with corona in the state) गेल्या २४ तासात राज्यात नवे २४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसते. याशिवाय, राज्यात स्वाइन फ्लू (H1N1), इन्फ्लुएंझा (H2N2) चे रुग्णही आढळून आले आहेत. सध्या राज्यात ९६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर स्वाइन फ्लू (H1N1), इन्फ्लुएंझा (H2N2) चे ५२ रुग्ण आढळून आले आहेत.


स्वाइन फ्लू (H1N1), इन्फ्लुएंझा (H2N2) आणि कोरोना (corona) हे तिन्ही संसर्गजन्य रोग आहेत आणि विषाणूंद्वारे पसरतात. त्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता आहे. म्हणून मास्क लावून घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात कोरोनाचे २४ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या ९६ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. त्यात मुंबईत २८, ठाणे २५, पालघर २, रायगड ७, सिंधुदुर्ग १, पुणे २९ रुग्णांचा समावेश आहे. आज दिवसभरात ११ कोरोना रुग्णांना डिस्चार्च देण्यात आला आहे. समाधानकारक बाब अशी कोरोनामुळे आज दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही. सध्या फॅटिलिटी रेट हा १.८१ टक्के इतर आहेत. तर रिकव्हरी रेट ९१.१८ टक्के आहे.


सक्रीय रुग्णांपैकी सध्या होम आयसोलेशनमध्ये ७८ रुग्ण आहेत. तर रुग्णालयात ५ रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै ते १२ जुलैच्या दरम्यान राज्यात ७१ रुग्ण होते. त्यानंतर त्यात किंचीत वाढ झाली होती. त्यामुळं पुढच्या आठवड्यात म्हणजे, १३ जुलै ते १९ जुलै दरम्यान ७५ कोरोना रुग्ण आढळले होते. २० जुलै ते २७ जुलैच्या दरम्यान ७० रुग्ण आढळले आहेत. आता यात मोठी वाढ झाली असून २७ जुलै ते २ ऑगस्ट च्या दरम्यान ९६ रुग्ण आहेत.


कोरोनाची धोका वाढत असतांना स्वाइन फ्लू (H1N1), इन्फ्लुएंझा (H2N2) च्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. स्वाइन फ्लूच्या १ जानेवारी ते ३१ जुलै पर्यंत ६८४ केसेस आढळून आल्या होत्या. या काळात ६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर इन्फ्लुएंझाचे ९५० रुग्ण आढळून आले होते. काल स्वाइन फ्लूचे १५ तर इन्फ्लुएंझाचे ३७ रुग्ण आढळून आले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य