दोन हजारांच्या तब्बल ४२ हजार कोटी रुपयांच्या नोटा म्हणजेच १२ टक्के नोटा कोणाकडे आहेत?

३१ जुलैपर्यंत दोन हजारांच्या ८८ टक्के नोटा बँकांमध्ये जमा


मुंबई : भारतीय रिझर्व बँकने (आरबीआय) १९ मे रोजी दोन हजारांच्या नोटा चलनातून माघारी घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर बँकांमध्ये २३ मेपासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात येत आहेत. मात्र अद्यापही तब्बल ४२ हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा केलेल्या नाहीत. या नोटा कुणाकडे असतील, यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.


आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२३ पर्यंत दोन हजार रुपयांच्या एकूण ८८ टक्के नोटा बँकिंग प्रणालीमध्ये परत आल्या आहेत.


आरबीआयच्या माहितीनुसार, १९ मे २०२३ पर्यंत ३.५६ लाख कोटी किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामध्ये होत्या. त्यापैकी ३१ जुलै पर्यंत ३.१४ लाख कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. त्यामुळे आता फक्त ४२ हजार कोटी रुपयांच्या नोटा चलनामध्ये उरल्या आहेत. ३० सप्टेंबर २०२३ ही दोन हजारांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची शेवटची तारीख आहे.

Comments
Add Comment

Barabanki Road Accident : वेगमर्यादेचा बळी! बाराबंकीत ट्रक-अर्टिगाच्या धडकेत ६ ठार, ८ गंभीर जखमी; कारचा अक्षरशः चक्काचूर!

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर

Bengaluru News : क्रूरतेचा कळस! मोलकरणीनं लिफ्टमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला आपटून संपवलं; मोलकरणीचं खोटं नाटक CCTV फूटेजमुळे उघड

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) येथील बागलूर (Bagaluru) मधील एका अपार्टमेंटमध्ये मुक्या जनावरासोबत अतिशय

Naxalite Surrender : 'सुनीता'चा माओवादी संघटनेला रामराम! १४ लाखांचे इनाम असलेली महिला नक्षलवादी अखेर शरण

बालाघाट : नक्षलग्रस्त भागातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बालाघाट

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय

निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास होणार कारवाई नवी दिल्ली  : रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी,

'पप्पू, टप्पू आणि अप्पू' - महाआघाडी म्हणजे गांधीजींची तीन माकडं!

योगी आदित्यनाथ यांचा बिहारमधून राहुल, तेजस्वी, अखिलेशवर हल्लाबोल दरभंगा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या

राहुल गांधींनी केला छठी मैय्याचा अपमान; बिहारमध्ये प्रचंड बहुमताने एनडीए सरकार स्थापन होईल - अमित शाह

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शेओहर आणि सीतामढी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)