Gautala Sanctuary : गौताळा अभयारण्यात पर्यटकांना बंदी... काय आहे याचं कारण?

१५ सप्टेंबरनंतर जाता येणार...


छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्याच्या दिवसांत पिकनिकला (Monsoon Picnic)जाण्याची एक वेगळीच मज्जा असते. अनेकजण खास सुट्टी काढून आपल्या मित्रांसोबत पिकनिकला जायचा बेत आखतात. मात्र हल्ली आनंद घेण्यापेक्षा सोशल मीडियावर (Social Media) दिखाव्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच की काय अनेकजण वाहत्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी (Selfie) काढतात, रील्स (Reels)बनवतात आणि कधीकधी तोल सावरता न आल्याने आपला जीव गमावून बसतात. याच घटना होऊ नयेत याकरता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील गौताळा अभयारण्यात (Gautala Sanctuary) पर्यटकांना १५ सप्टेंबरपर्यंत येण्यास बंदी घातली आहे.


यंदाच्या पावसाळ्यात सहलींदरम्यान अनेक लोक पाण्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर काहीजण फोटोशूट करता करता तोल जाऊन पडल्याच्याही घटना आहेत. गौताळा अभयारण्यात देखील जास्त प्रमाणात पाऊस पडून नाल्यांना पूर येत असतो. त्यामुळे येथे येणारे अनेक पर्यटक सेल्फी काढण्याच्या मोहात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, यामुळे १५ सप्टेंबरपर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे.


मागील काही दिवसांत झालेल्या कमी-अधिक पावसामुळे पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. लेण्या, धबधबे, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, किल्ले यांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातात. गौताळा अभयारण्यात देखील अशीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत असते. पावसाळ्यात अधिक खुलून दिसणारे गौताळा अभयारण्य पर्यटकांना आकर्षित करते. मात्र, आता वनविभागाने १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे प्रवेश बंदी घातली असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला असून, गौताळा अभयारण्य पाहण्यासाठी त्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nashik News : नाशिकमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, पोलीस तपास सुरु

नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील वडाळा नाका परिसरातील नामांकित हॉटेलमध्ये एका तरुणाचा मृतदेह (Deathbody) आढळून आला. या घटनेनंतर

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

School Student Accident : काळीज पिळवटून टाकणारा अपघात! बस मधून उतरली अन् रस्ता ओलांडताच भीषण घडलं

भरधाव दुचाकीची शाळकरी मुलीला जोरदार धडक School Student Accident : बीड: बीड (Beed) जिल्ह्यातील गया नगर परिसरात शाळेतून घरी परतणाऱ्या

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या राशीनुसार नेसा 'या' शुभ रंगांची साडी

मुंबई : विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जाणारा वटपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही तासांवर

Fairness Cream : धक्कादायक! गोरं करणारी क्रीम ठरतेय धोकादायक; क्रीम वापरल्याने होतोय कायमचा किडणी किंवा गंभीर त्वचाविकार

- डॉक्टरांनी महत्वाची बातमी Fairness Cream : गोरं दिसण्याच्या हव्यासापोटी फेयरनेस क्रीमचा सर्रास वापर करणाऱ्यांसाठी

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली  आहे. महामार्ग जेवढा सोईस्कर आणि सुखकर