Gautala Sanctuary : गौताळा अभयारण्यात पर्यटकांना बंदी... काय आहे याचं कारण?

१५ सप्टेंबरनंतर जाता येणार...


छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्याच्या दिवसांत पिकनिकला (Monsoon Picnic)जाण्याची एक वेगळीच मज्जा असते. अनेकजण खास सुट्टी काढून आपल्या मित्रांसोबत पिकनिकला जायचा बेत आखतात. मात्र हल्ली आनंद घेण्यापेक्षा सोशल मीडियावर (Social Media) दिखाव्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच की काय अनेकजण वाहत्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी (Selfie) काढतात, रील्स (Reels)बनवतात आणि कधीकधी तोल सावरता न आल्याने आपला जीव गमावून बसतात. याच घटना होऊ नयेत याकरता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील गौताळा अभयारण्यात (Gautala Sanctuary) पर्यटकांना १५ सप्टेंबरपर्यंत येण्यास बंदी घातली आहे.


यंदाच्या पावसाळ्यात सहलींदरम्यान अनेक लोक पाण्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर काहीजण फोटोशूट करता करता तोल जाऊन पडल्याच्याही घटना आहेत. गौताळा अभयारण्यात देखील जास्त प्रमाणात पाऊस पडून नाल्यांना पूर येत असतो. त्यामुळे येथे येणारे अनेक पर्यटक सेल्फी काढण्याच्या मोहात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, यामुळे १५ सप्टेंबरपर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे.


मागील काही दिवसांत झालेल्या कमी-अधिक पावसामुळे पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. लेण्या, धबधबे, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, किल्ले यांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातात. गौताळा अभयारण्यात देखील अशीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत असते. पावसाळ्यात अधिक खुलून दिसणारे गौताळा अभयारण्य पर्यटकांना आकर्षित करते. मात्र, आता वनविभागाने १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे प्रवेश बंदी घातली असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला असून, गौताळा अभयारण्य पाहण्यासाठी त्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : शेतकरी कर्जमाफी योजनेची १० दिवसांत अंमलबजावणी - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

- ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ, राज्याच्या तिजोरीवर ३६ हजार कोटी रुपयांचा भार पडणार मुंबई : सततचा अवकाळी पाऊस, दुष्काळ,

Pune-Miraj Railway 21 Days Block : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-मिरज मार्गावर २१ दिवसांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

- जाणून घ्या वेळापत्रकातले मोठे बदल पुणे : पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम आणि नीरा यार्डच्या

Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला धडक; दोन महिलांचा मृत्यू

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात रविवारी एक भीषण अपघात झाला. देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या

Satara Suicide : WhatsApp स्टेटसमुळे वाचले महिला पोलिसाचे प्राण; नेमकं काय घडलं?

Rajendra Jain : मंत्री भुजबळांचे आशीर्वाद घेत राजेंद्र जैन यांच्याकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar) यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यसभेच्या

KIDNAPPING : विवाहित महिलेशी संभाषणाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका

BARAMATI: बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.