Gautala Sanctuary : गौताळा अभयारण्यात पर्यटकांना बंदी... काय आहे याचं कारण?

१५ सप्टेंबरनंतर जाता येणार...


छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्याच्या दिवसांत पिकनिकला (Monsoon Picnic)जाण्याची एक वेगळीच मज्जा असते. अनेकजण खास सुट्टी काढून आपल्या मित्रांसोबत पिकनिकला जायचा बेत आखतात. मात्र हल्ली आनंद घेण्यापेक्षा सोशल मीडियावर (Social Media) दिखाव्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच की काय अनेकजण वाहत्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी (Selfie) काढतात, रील्स (Reels)बनवतात आणि कधीकधी तोल सावरता न आल्याने आपला जीव गमावून बसतात. याच घटना होऊ नयेत याकरता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील गौताळा अभयारण्यात (Gautala Sanctuary) पर्यटकांना १५ सप्टेंबरपर्यंत येण्यास बंदी घातली आहे.


यंदाच्या पावसाळ्यात सहलींदरम्यान अनेक लोक पाण्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर काहीजण फोटोशूट करता करता तोल जाऊन पडल्याच्याही घटना आहेत. गौताळा अभयारण्यात देखील जास्त प्रमाणात पाऊस पडून नाल्यांना पूर येत असतो. त्यामुळे येथे येणारे अनेक पर्यटक सेल्फी काढण्याच्या मोहात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, यामुळे १५ सप्टेंबरपर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे.


मागील काही दिवसांत झालेल्या कमी-अधिक पावसामुळे पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. लेण्या, धबधबे, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, किल्ले यांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातात. गौताळा अभयारण्यात देखील अशीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत असते. पावसाळ्यात अधिक खुलून दिसणारे गौताळा अभयारण्य पर्यटकांना आकर्षित करते. मात्र, आता वनविभागाने १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे प्रवेश बंदी घातली असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला असून, गौताळा अभयारण्य पाहण्यासाठी त्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा