Gautala Sanctuary : गौताळा अभयारण्यात पर्यटकांना बंदी... काय आहे याचं कारण?

  119

१५ सप्टेंबरनंतर जाता येणार...


छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्याच्या दिवसांत पिकनिकला (Monsoon Picnic)जाण्याची एक वेगळीच मज्जा असते. अनेकजण खास सुट्टी काढून आपल्या मित्रांसोबत पिकनिकला जायचा बेत आखतात. मात्र हल्ली आनंद घेण्यापेक्षा सोशल मीडियावर (Social Media) दिखाव्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच की काय अनेकजण वाहत्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी (Selfie) काढतात, रील्स (Reels)बनवतात आणि कधीकधी तोल सावरता न आल्याने आपला जीव गमावून बसतात. याच घटना होऊ नयेत याकरता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील गौताळा अभयारण्यात (Gautala Sanctuary) पर्यटकांना १५ सप्टेंबरपर्यंत येण्यास बंदी घातली आहे.


यंदाच्या पावसाळ्यात सहलींदरम्यान अनेक लोक पाण्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर काहीजण फोटोशूट करता करता तोल जाऊन पडल्याच्याही घटना आहेत. गौताळा अभयारण्यात देखील जास्त प्रमाणात पाऊस पडून नाल्यांना पूर येत असतो. त्यामुळे येथे येणारे अनेक पर्यटक सेल्फी काढण्याच्या मोहात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, यामुळे १५ सप्टेंबरपर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे.


मागील काही दिवसांत झालेल्या कमी-अधिक पावसामुळे पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. लेण्या, धबधबे, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, किल्ले यांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातात. गौताळा अभयारण्यात देखील अशीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत असते. पावसाळ्यात अधिक खुलून दिसणारे गौताळा अभयारण्य पर्यटकांना आकर्षित करते. मात्र, आता वनविभागाने १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे प्रवेश बंदी घातली असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला असून, गौताळा अभयारण्य पाहण्यासाठी त्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित