RPF Constable opened fire : सुरक्षारक्षकच ठरला प्राणघातक! प्रवाशांवर केलेल्या गोळीबारात चार जण जागीच ठार

  174

गोळीबाराचे कारण ऐकून तुमचाही थरकाप उडेल...


पालघर : रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेला आरपीएफ जवानच (RPF constable) प्रवाशांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास जयपूर एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express) एका आरपीएफ जवानाने प्रवाशांशी झालेल्या बाचाबाचीतून गोळीबार केला. चेतन सिंह (Chetan Sinha) असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे. या गोळीबारामध्ये तीन प्रवासी तर एका पोलिसाचा मृत्यू आणि काही प्रवासी जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे.


घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस (GRP Police) आणि आरपीएफ पोलीस (RPF Police) घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. गोळीबारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. सध्या ही ट्रेन मुंबई सेंट्रल इथे दाखल झाली आहे. जीआरपीच्या जवानांनी गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबलला ताब्यात घेऊन बोरीवलीला आणलं आहे. तर चार जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मानसिक तणावातून आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.



नेमकं काय घडलं ?


राजस्थान ते मुंबई सेंट्रल या जयपूर एक्स्प्रेसमध्ये आज पहाटे पाचच्या सुमारास वापीहून बोरीवली, मीरा रोड स्टेशनदरम्यान गोळीबाराची घटना घडली. जयपूर एक्स्प्रेस राजस्थानमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये (Palghar) दाखल होताच B-5 डब्यात अचानक गोळीबाराचा आवाज झाला. गोळीबाराच्या आवाजाने डब्यात बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.


आरपीएफ हवालदार चेतन सिंहचा ट्रेनच्या डब्यातील काही प्रवाशांसोबत वाद झाला होता. यावेळी संतापलेल्या चेतन सिंहने प्रवाशांचे दिशेने बंदूक उगारली. त्याच्या सहकाऱ्याने त्याला थांबवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु रागाच्या भरात चेतन सिंहने त्याना जुमानले नाही आणि सहकाऱ्यावरही गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या सहकाऱ्यासह चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या