Kalyan: नागरिकांच्या घरांवर फेकले सुतळी बॉम्ब; कल्याणमधील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

मुंबई: कल्याण जवळील आंबिवली परिसरात नशेखोराकडून नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता नागरिकांसमोर नव्या संकटानं डोकं वर काढलं आहे. काही नशेखोरांनी सतीश यादव नावाच्या व्यक्तीच्या घरात जाऊन त्याला नाहक त्रास देत दिला. हा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नशेखोरांच्या गैरवर्तणुकीमुळे नागरीक त्रस्त झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सतिशने पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, नशेखोरांच्या विरोधात पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. कल्याणमधील आंबिवलीनजीक पाटील नगर हा परिसर आहे. या परिसरात नशेखोर नागरिकांना त्रास देतात. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात काही नशेखोर नागरिकांच्या घरावर सुतळी बॉम्ब टाकत होते. त्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली, याची माहिती समोर आली नाही.


व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आलं. सतिश नावाचा व्यक्ती पोलिसांकडे मदत मागत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतं. त्याचदरम्यान काही नशेखोर त्याला धरून ठेवतात. तो त्यांना त्या परिसरातून निघून जाण्यास सांगतो. हा व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. आरोपींविरोधात ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




Comments
Add Comment

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न

CM Devendra Fadnavis : शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार

Tragedy in Chhatrapati Sambhajinagar : मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील दुर्घटनेने हळहळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. मोबाईल

CM Devendra Fadnavis : केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी खर्चात शालेय शिक्षण विभाग अव्वल

- ९६ टक्के निधीचा विनियोग; कृषी, ग्रामीण विकास आणि महिला-बाल विकास विभागांचीही उल्लेखनीय कामगिरी मुंबई : केंद्र

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय! ३७४ हेक्टर जमिनीवरील ‘महाराष्ट्र शासन राखीव वने’ नोंद कायम

ठाणे : भाईंदरपाडा (ओवळे) येथील तब्बल ३७४ हेक्टर ७९ आर वनजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादात

CM Devendra Fadnavis : ‘सीएसआर’ निधीच्या वापरासाठी राज्यात स्थापन होणार ‘महा सीएसआर प्राधिकरण’

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणार मुंबई : महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक