India vs Pakistan cricket Match : ठरलं! भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आता १५ ऑक्टोबर नाही, तर ‘या’ तारखेला…

Share

काय आहे या बदलाचे कारण?

गुजरात : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील बहुप्रतिक्षित ICC विश्वचषक सामन्याचे वेळापत्रक बदलले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरच्या मूळ वेळापत्रकाच्या एक दिवस आधी, १४ ऑक्टोबरला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मुद्द्यावर अद्याप बीसीसीआय किंवा आयसीसीने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. परंतु पुनर्नियोजनाची विंडो पाहता, १४ ऑक्टोबर ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील विश्वचषक स्पर्धेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ठिकाणात कोणताही बदल करण्यात आलेला नसून हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमलाच (Narendra Modi Stadium) होणार आहे.

गेल्या महिन्यात बीसीसीआयने (BCCI) वनडे वर्ल्डकपचे (World Cup) संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना हा १५ ऑक्टोबर घटस्थापनेदिवशीच होणार होता. मात्र बीसीसीआयला सुरक्षा एजन्सींनी या सामन्याची तारीख बदलावी अशी विनंती केली होती. नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने गुजरातमध्ये गरबा खेळण्यासाठी प्रचंड गर्दी असते. त्यात भारत आणि पाकिस्तान यांचा सामना झाल्यास सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे, अशी ती विनंती होती. बीसीसीआयने देखील या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित बैठक घेतली होती.

गेल्या आठवड्यात, बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की तीन एजन्सींनी आयसीसीला पत्र लिहिल्यानंतर एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. ४-५ दिवसांचे अंतर कमी करण्यासाठी सामन्यांच्या तारखा आणि वेळा बदलल्या जातील मात्र ठिकाणे बदलली जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. जर खेळांमध्ये सहा दिवसांचे अंतर असेल तर ते ४-५ दिवसांपर्यंत कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तीन-चार दिवसांत चित्र स्पष्ट होईल. आयसीसीशी सल्लामसलत करून बदल होतील, असे शहा म्हणाले होते.

त्यानुसार हा सामना शक्यतो घटस्थापनेच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला खेळवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. याबाबतची अधिकृत घोषणा बीसीसीआय आज करण्याची शक्यता आहे. या सामन्याबरोबरच अजून काही सामन्यांची देखील तारीख बदलली जाऊ शकते.

चाहत्यांचा मात्र हिरमोड

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची नवीन तारीख स्थानिक प्रशासनाला मदत करू शकते, परंतु १५ ऑक्टोबरच्या वेळापत्रकानुसार आधीच व्यवस्था केलेल्या हजारो क्रिकेट चाहत्यांचा मात्र हिरमोड होऊ शकतो. या थरारक संघर्षाचे साक्षीदार होण्यासाठी चाहत्यांनी अहमदाबादमध्ये हॉटेल्स, अगदी रुग्णालये कशी बुक केली आहेत याबद्दल अनेक अहवाल आले आहेत. परंतु कार्ड्सवरील नवीन तारखेसह, चाहत्यांना १४ ऑक्टोबरच्या वेळापत्रकानुसार बदल करावे लागणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

प्रहार बुलेटीन: ०५ जुलै २०२४

दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…

1 hour ago

Mumbai News : व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या ‘या’ विद्यार्थिनींना मिळणार मोफत प्रवेश!

राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…

1 hour ago

NEET PG Exam पुढे ढकलली! नवीन तारीख आली समोर

प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…

3 hours ago

Ranjeet Nimbalkar : राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये!

यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…

3 hours ago

Nitesh Rane : गुजरातच्या बसवर टीका करणारा मविआचा नेता अदानींचा खास ड्रायव्हर!

आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…

3 hours ago

Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील भोलेबाबाचा गलिच्छ प्रकार उघडकीस!

भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…

4 hours ago