Lokmanya Tilak Purskar : शरद पवारांनी दिला अरविंद केजरीवालांना धक्का!

Share

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्याचा सन्मान करण्याकरता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak Purskar) जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण १ ऑगस्ट रोजी पुण्यात होणा-या सोहळ्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार (Sharad Pawar) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती होती. मात्र, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी भाजपसोबत संघर्ष करणार असल्याची भूमिका घेतली होती. यावर आता सोहळ्याचे मुख्य आयोजक रोहित टिळक (Rohit Tilak) यांनी भाष्य केलं असून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा कार्यक्रम जसा ठरला आहे तसाच होणार आहे. यात शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, १ ऑगस्ट रोजी दिल्ली सरकारसंबंधी एक विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे शरद पवारांनी त्या दिवशी राज्यसभेत उपस्थित राहावं यासाठी आपचे नेते अरविंद केजरीवाल प्रयत्न करणार होते. मात्र शरद पवार या दिवशी पुण्यातच थांबणार असल्याने राज्यसभेत हा केजरीवालांसाठी धक्का मानला जात आहे.

रोहित टिळक म्हणाले…

रोहित टिळकांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, हा कार्यक्रम ठरलेल्या पद्धतीने होणार आहे. तर शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांनी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच अजून तरी कोणीही गैरहजर राहण्याबद्दल कळवलं नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हे राजकीय व्यासपीठ नाही

रोहित टिळक हे काँग्रेसचे नेते आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार काँग्रेस पक्षाकडूनच पंतप्रधान मोदींना दिला जाण्याबाबत होत असलेल्या टीकेवर बोलताना रोहित टिळक म्हणाले की, हे राजकीय व्यासपीठ नाही. तसेच यापूर्वी इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, शरद पवार यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनाही हा पुरस्कार दिला गेला आहे. निरनिराळ्या क्षेत्रात काम केलेल्या लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. कॉंग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देण्यास विरोध करत असले तरी हा पुरस्कार राजकारण विरहित आहे. त्यामुळे याचं राजकारण का केलं जातंय हे कळत नाहीये. तसेच आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं रोहित टिळक यांनी म्हटलं आहे.

हा कार्यक्रम सकाळी पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुरस्कार वितरण सोहळा हा सकाळी पार पाडून सर्व नेते मंडळी दिल्लीत हजेरी लावणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या दिवसाचं आयोजन कसं असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…

20 minutes ago

Curd: दह्यासोबत या गोष्टी खाल्या तर, पोटात विष तयार होईल!

मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…

45 minutes ago

Mahesh Babu : तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून समन्स

हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…

50 minutes ago

Earth Day : पृथ्वीचे वाढते तापमान पर्यावरणासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…

1 hour ago

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

2 hours ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

3 hours ago