Lokmanya Tilak Purskar : शरद पवारांनी दिला अरविंद केजरीवालांना धक्का!

  150

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्याचा सन्मान करण्याकरता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak Purskar) जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण १ ऑगस्ट रोजी पुण्यात होणा-या सोहळ्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार (Sharad Pawar) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती होती. मात्र, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी भाजपसोबत संघर्ष करणार असल्याची भूमिका घेतली होती. यावर आता सोहळ्याचे मुख्य आयोजक रोहित टिळक (Rohit Tilak) यांनी भाष्य केलं असून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा कार्यक्रम जसा ठरला आहे तसाच होणार आहे. यात शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.


दरम्यान, १ ऑगस्ट रोजी दिल्ली सरकारसंबंधी एक विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे शरद पवारांनी त्या दिवशी राज्यसभेत उपस्थित राहावं यासाठी आपचे नेते अरविंद केजरीवाल प्रयत्न करणार होते. मात्र शरद पवार या दिवशी पुण्यातच थांबणार असल्याने राज्यसभेत हा केजरीवालांसाठी धक्का मानला जात आहे.



रोहित टिळक म्हणाले...


रोहित टिळकांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, हा कार्यक्रम ठरलेल्या पद्धतीने होणार आहे. तर शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांनी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच अजून तरी कोणीही गैरहजर राहण्याबद्दल कळवलं नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



हे राजकीय व्यासपीठ नाही


रोहित टिळक हे काँग्रेसचे नेते आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार काँग्रेस पक्षाकडूनच पंतप्रधान मोदींना दिला जाण्याबाबत होत असलेल्या टीकेवर बोलताना रोहित टिळक म्हणाले की, हे राजकीय व्यासपीठ नाही. तसेच यापूर्वी इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, शरद पवार यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनाही हा पुरस्कार दिला गेला आहे. निरनिराळ्या क्षेत्रात काम केलेल्या लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. कॉंग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देण्यास विरोध करत असले तरी हा पुरस्कार राजकारण विरहित आहे. त्यामुळे याचं राजकारण का केलं जातंय हे कळत नाहीये. तसेच आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं रोहित टिळक यांनी म्हटलं आहे.


हा कार्यक्रम सकाळी पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुरस्कार वितरण सोहळा हा सकाळी पार पाडून सर्व नेते मंडळी दिल्लीत हजेरी लावणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या दिवसाचं आयोजन कसं असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )