जुलै महिन्यातील पावसाचा विक्रम मोडीत

  163

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत कोसळत असलेल्या पावसाने जुलै महिन्यातील विक्रम मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे जुलै महिना संपण्यास अजूनही चार दिवस शिल्लक आहेत. मुंबईच्या सांताक्रुझ वेधशाळेत जुलै महिन्यात (२६ जुलैपर्यंत) १५५७.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याचे भारतीय हवामान विभागाने माहिती दिली आहे.


यावर्षी जून महिन्यात सरासरीपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस चांगलाच बरसत आहे. सांताक्रुझमध्ये जुलै २०२० मध्ये आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. जुलै २०२० मध्ये १५०२ मिमी पाऊस झाला होता. मात्र, यावर्षी मुंबईमध्ये २६ दिवसातच हा विक्रम मोडीत निघाला. सांताक्रुझ वेधशाळेत १५५७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.



अद्यापही जुलैचा महिना संपायला ४ दिवसांचा कालावधी आहे. सोबतच मुंबईत काल मुसळधार पाऊस झाला आणि आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने जुलै महिन्यातील यंदाच्या हंगामात सर्वाधिक पावसाची नोंद होणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री