Uddhav Thackeray Interview : मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना एकावर एक टोले... म्हणाले 'ही तर घरगुती मुलाखत...'

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र


मुंबई : उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नुकतीच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक मुलाखत घेतली. या मुलाखतीवर भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची या मुलाखतीवर कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आजच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) मुख्यमंत्रीही उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भरभरुन बोलले आहेत. उद्धव ठाकरेंच्या आळशीपणाच्या एकावर एक मुद्दयांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काहीतरी एक दोन दिवसांपूर्वी कुणीतरी मुलाखत घेतली. जाऊ दे मी त्यात पडत नाही. घरगुती मुलाखत होती. डबल इंजिनचं काम पाहून अजित पवार आमच्या बरोबर आले आहे. ट्रिपल इंजिनचं काम वेगात सुरु आहे. आम्हाला काही लोकांनी नावं ठेवली. पण आम्ही बंद पडलेली कामं सुरु नाही केली का? आम्ही इगो वगैरे बाजूला ठेवले, इगो आणि अहंकार राज्याला मागे घेऊन जातो हे लक्षात घ्यायला पाहिजे, असं ते म्हणाले.



कुटुंबापुरतं मर्यादित उद्धव ठाकरेंचं सरकार


आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत. वर्क फ्रॉम होम आमच्या पद्धतीत बसत नाही. इर्शाळवाडीची दुर्घटना झाली तेव्हा सरकार दरडग्रस्तांच्या पाठिशी सरकार उभं राहिलं. तसंच ज्या ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली तिथल्या नागरिकांना आपण मदतीचा हात दिला. आपलं सरकार हे सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना मदत करणारं सरकार आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्यापुरतं आमचं सरकार मर्यादित नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.



नुसती तोंडाचीच वाफ आणि बुडबुडे


इर्शाळगडला दुर्घटना घडली तेव्हा मी तिथे गेलो होतो. काही लोक व्हॅनिटी व्हॅनमधून आले होते. मी गेलो म्हणून मी मोठेपणा सांगत नाही. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी तेव्हा मी संपर्कात होतो. सगळं काम सुरु होतं. एवढी मोठी यंत्रणा पोहचली आणि त्यांना मदत झाली. मी फक्त देखावा करायचा म्हणून गेलो नव्हतो. रस्त्यावर चिखल तुडवत आम्ही जातो. प्रकल्प बघायला जातो ही वस्तुस्थिती आहे. काही लोक हे वाफेचं इंजिन नाही तर नुसती त्यांच्या तोंडाचीच वाफ असते आणि बुडबुडे येतात असाही टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही विचलीत होणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.



एकदा आमच्या मंचावर या मग...


आमच्या कामाचा वेग वाढल्यामुळे काही लोकांना पोटदुखी झाली आहे. आपल्याला तर सगळ्यांना माहित आहेच. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते आहोत. त्यांच्या विचारांवरच आम्ही पुढे जात आहोत. आम्ही शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला. काही लोक म्हणाले की ही जाहिरातबाजी आहे. पण एकदा आमच्या मंचावर या तुम्हाला वस्तुस्थिती कळेल. काही लोक अनेकांना घरात घेत नव्हते त्यांना सरकार तुमच्या दारी या योजनेचं महत्त्व काय समजणार? असाही प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विचारला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nehru Science Centre : नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्‍थानक ते वरळी प्रॉमेनेडला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग प्रस्ताव मंजूर

मुंबईकरांच्या सोयीसाठी सुमारे १ किलोमीटर लांबीचा व ७.५ मीटर रुंदीचा मार्ग मुंबईच्‍या पर्यटनाला मिळणार मोठी

BM C : मुंबईत धूर फवारणीच्या नगरसेवकांची बोंबाबोंब

धूर फवारणींची मशिन्स पडतात बंद प्रत्येक नगरसेवक प्रभागात एक मशिन्स खरेदीची केली स्थायी समितीत मागणी मुंबई

Vaccinated Stray Dogs : क्यु आर कोड पहा आणि आपला कुत्रा ओळखा

लसीकरण झालेल्या भटक्या श्वानांसाठी क्यूआर कोडयुक्त परावर्तित कॉलर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Crane Accident : मुंबईत मोठा अपघात! कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर क्रेन कोसळली

मुंबई : मुंबईतील कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. एमएमआरडीएकडून सुरू

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या CDOE प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (CDOE) चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि

Sanjay Rathod : मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, क्षेत्रीय स्तरावरील उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर