Narayan Rane : महाराष्ट्रात आज एका टिनपाटाच्या डब्ब्याचा चिरका ताशा तडतडतोय!

टिनपाटाच्या डब्ब्याचा चिरका ताशा (भाग-१)


भाजपच्या पाठीत २०१९ साली बेईमानीचा खंजीर खुपसून हिंदुत्वाशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारे स्वतःलाच सुसंस्कृत आणि इमानदार म्हणवून घेतात. याला निर्लज्जपणाशिवाय दुसरे नाव नाही. अडीच वर्षात अडीच तास सुद्धा मंत्रालयात आले नाहीत आणि अडीच वर्ष काम केले म्हणतात. घरबशेपणा हेच त्यांच्यासाठी काम!



स्वतःच्या भाऊ भावजयांना जो आपल्या बरोबर ठेवू शकत नाही. त्याने महाराष्ट्रातील जनता मला आपल्या कुटुंबापैकी एक समजते असे म्हणणे हा मोठाच विनोद. भाजपची कावीळ झाल्यामुळे यांना दुसरं काही दिसत नाही. महाराष्ट्राच्या जनतेचा एकही प्रश्न या काविळीमुळे त्यांना दिसत नाही. आपल्या सत्तालोलुपतेमुळे यांनी शिवसेना संपविली आणि खापर दुसऱ्यांवर फोडत आहेत. दुसऱ्यांना नावे ठेवली तरी सत्तालोलुपतेमुळे तुम्ही स्वतःच्या वडिलांच्या विचारांना मूठमाती दिली हे महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही.



याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण होताना तुम्ही हातावर हात ठेवून गप्प होतात हेही जनतेच्या लक्षात आहे. एकाच मुलाखतीमध्ये अजित पवार घोटाळेबाज आणि प्रामाणिक सुद्धा! याला स्मृतिभ्रंश म्हणायचे की दोन दगडांवर पाय म्हणायचे ? ... क्रमशः




Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे