Narayan Rane : महाराष्ट्रात आज एका टिनपाटाच्या डब्ब्याचा चिरका ताशा तडतडतोय!

  1677

टिनपाटाच्या डब्ब्याचा चिरका ताशा (भाग-१)


भाजपच्या पाठीत २०१९ साली बेईमानीचा खंजीर खुपसून हिंदुत्वाशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारे स्वतःलाच सुसंस्कृत आणि इमानदार म्हणवून घेतात. याला निर्लज्जपणाशिवाय दुसरे नाव नाही. अडीच वर्षात अडीच तास सुद्धा मंत्रालयात आले नाहीत आणि अडीच वर्ष काम केले म्हणतात. घरबशेपणा हेच त्यांच्यासाठी काम!



स्वतःच्या भाऊ भावजयांना जो आपल्या बरोबर ठेवू शकत नाही. त्याने महाराष्ट्रातील जनता मला आपल्या कुटुंबापैकी एक समजते असे म्हणणे हा मोठाच विनोद. भाजपची कावीळ झाल्यामुळे यांना दुसरं काही दिसत नाही. महाराष्ट्राच्या जनतेचा एकही प्रश्न या काविळीमुळे त्यांना दिसत नाही. आपल्या सत्तालोलुपतेमुळे यांनी शिवसेना संपविली आणि खापर दुसऱ्यांवर फोडत आहेत. दुसऱ्यांना नावे ठेवली तरी सत्तालोलुपतेमुळे तुम्ही स्वतःच्या वडिलांच्या विचारांना मूठमाती दिली हे महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही.



याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण होताना तुम्ही हातावर हात ठेवून गप्प होतात हेही जनतेच्या लक्षात आहे. एकाच मुलाखतीमध्ये अजित पवार घोटाळेबाज आणि प्रामाणिक सुद्धा! याला स्मृतिभ्रंश म्हणायचे की दोन दगडांवर पाय म्हणायचे ? ... क्रमशः




Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक