Mumbai rain update: मुंबईत रेड अलर्टचा कालावधी वाढवला! हवामान विभागातर्फे नवीन नोटीस जारी

  122

मुंबई: गेल्या २४ तासांपासून मुंबई आणि उपनगर परिसरात पाऊस जराही उसंत न घेता कोसळत असल्याने सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अशातच पावसाचा वाढता जोर पाहून हवामान विभागाने रेड अलर्टचा कालावधी वाढवला आहे. सध्याच्या पावसाचा जोर पाहता उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत रेड अलर्ट वाढवण्यात आला आहे.


येत्या तीन-चार तासांमध्ये हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. आझाद मैदान, काळबादेवी, भायखळा, दहिसर, बोरिवली, कांदिवली या भागांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे याठिकाणची वाहतूक अत्यंत संथगतीने पुढे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणी भरलेल्या भागांमधून वाहन नेऊ नका. तसेच गरज असल्यासच घराबाहेर पडा, असे आवाहन पालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.



मुंबईच्या लाईफलाईनची स्थिती काय?


मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन उपनगरीय रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे अशा तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा सुरळीत होती. परंतु, दुपानंतर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाल्याने रेल्वे वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकात पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक संथ झाली आहे. मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेट आणि मरिनलाईन्स स्थानकांत पाणी साचले आहे. बोरिवली स्थानकांतही ट्रॅकवरील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटांच्या विलंबाने सुरु आहे. तर हार्बर रेल्वेच्या सेवेवरही काहीप्रमाणात परिणाम झाला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये