Mumbai rain update: मुंबईत रेड अलर्टचा कालावधी वाढवला! हवामान विभागातर्फे नवीन नोटीस जारी

मुंबई: गेल्या २४ तासांपासून मुंबई आणि उपनगर परिसरात पाऊस जराही उसंत न घेता कोसळत असल्याने सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अशातच पावसाचा वाढता जोर पाहून हवामान विभागाने रेड अलर्टचा कालावधी वाढवला आहे. सध्याच्या पावसाचा जोर पाहता उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत रेड अलर्ट वाढवण्यात आला आहे.


येत्या तीन-चार तासांमध्ये हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. आझाद मैदान, काळबादेवी, भायखळा, दहिसर, बोरिवली, कांदिवली या भागांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे याठिकाणची वाहतूक अत्यंत संथगतीने पुढे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणी भरलेल्या भागांमधून वाहन नेऊ नका. तसेच गरज असल्यासच घराबाहेर पडा, असे आवाहन पालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.



मुंबईच्या लाईफलाईनची स्थिती काय?


मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन उपनगरीय रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे अशा तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा सुरळीत होती. परंतु, दुपानंतर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाल्याने रेल्वे वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकात पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक संथ झाली आहे. मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेट आणि मरिनलाईन्स स्थानकांत पाणी साचले आहे. बोरिवली स्थानकांतही ट्रॅकवरील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटांच्या विलंबाने सुरु आहे. तर हार्बर रेल्वेच्या सेवेवरही काहीप्रमाणात परिणाम झाला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

MIM मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार, एवढे उमेदवार रिंगणात उतरवणार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. हे आरक्षण जाहीर होऊन दोन दिवस होत नाहीत तोच