12 MLAs in Legislative Assembly : विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीचा फॉर्म्युला ठरला!

  108

आधी होते 'हे' सूत्र... आता कोणाला किती जागा मिळणार?


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न अखेर सुटणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती हटवल्यानंतर या १२ आमदारांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर (Maharashtra Assembly Monsoon Session) राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. यानुसार, महायुतीने सदस्य संख्येचे सूत्र निश्चित केले असून भाजपच्या वाट्याला ६, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला ३ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.


तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आघाडी सरकारने नोव्हेंबर २०२१मध्ये १२ राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची यादी राजभवनाला दिली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेवटपर्यंत माजी राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी ठाकरे सरकारने दिलेली नावे मंजूर केली नव्हती. उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी कोशारींवर टीका केल्याने यावरुन राजकारणही रंगले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही यादी रद्द केली. मात्र यादरम्यान हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. आता ११ जुलैला नियुक्तीची स्थगिती सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) उठवल्याने आता राज्यपाल नियुक्त आमदार होण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.



आधी होते 'हे' सूत्र


राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर जाण्यासाठी महायुतीत अनेक जण इच्छुक आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट सरकारमध्ये सहभागी होण्याआधी भाजप आणि शिंदे सरकार यांच्यात ८ आणि ४ असे सूत्र निश्चित झाले होते. मात्र अजित पवार यांच्या सहभागानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षांनी राज्यपाल नामनियुक्तीच्या समान म्हणजे प्रत्येकी ४ जागा घ्याव्यात, अशी चर्चा झाली, परंतु तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार राज्यपाल नामनियुक्त सदस्यांचे सूत्र निश्चित करण्यात आले. त्यानुसार भाजपच्या कोट्यातून ६, तर शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून प्रत्येकी ३ नावे दिली जाणार आहेत.



कोण नावे निश्चित करणार ?


भाजप आणि शिंदे गटात इच्छुकांची संख्या जास्त आहे. भाजपची नावे दिल्लीतून निश्चित होतील, तर शिंदे आणि अजितदादा गटाची नावे अनुक्रमे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निश्चित केली जातील. त्यानंतर १२ सदस्यांची एकत्रित यादी राजभवनाला पाठवली जाईल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्यपाल नामनियुक्त सदस्यांच्या १२ नियुक्त्या केल्या जातील. या नियुक्त्यांनंतर विधान परिषदेतील संख्याबळाचे पक्षीय समीकरण बदलणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

GSB Ganpati First Look: मुंबईतील सगळ्यात श्रीमंत बाप्पाची पहिली झलक दिमाखात सादर

मुंबईच्या GSB सेवा मंडळाच्या बाप्पाच्या फर्स्ट लुकचे दिमाखात अनावरण  मुंबई: गणेश चतुर्थीसाठी आता एकच दिवस बाकी

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी