उद्धव ठाकरेंना शाळेत कोणी शिपायाची नोकरी तरी देणार आहे का?

भाजप आमदार नितेश राणे यांचा खोचक सवाल


मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या लायकीवर भाष्य करणार्‍या ठाकरे गटाच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज विधानभवलात पत्रकारांशी बोलताना खडे बोल सुनावले. यावेळेस, उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) लायकी कोणी काढू नये असं म्हणणार्‍या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांशिवाय लायकी काय? असा खडा सवाल विचारला. दरम्यान, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवरदेखील मिश्कीलपणे निशाणा साधला.


नितेश राणे म्हणाले, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ज्येष्ठ नेते आहेत, मंत्रीही राहिलेले आहेत, त्यांची लायकी काढण्याचं काम आज स्वतः नागडा असलेल्या संजय राजाराम राऊतने केलेलं आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, उद्धव ठाकरेंची लायकी कोणी काढू नये आणि काढणार्‍या लोकांची पात्रता काय, असा याच्यासारख्या नालायक माणसाने उल्लेख केला. पण उद्धव ठाकरेंच्या नावातून बाळासाहेब ठाकरे जर काढून टाकलं तर उद्धव ठाकरेंना शाळेत कोणी प्युनची किंवा क्लर्कची नोकरी तरी देणार आहे का? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.


पुढे नितेश राणे म्हणाले, सगळ्या गोष्टी बाळासाहेबांच्या नावाने खपवायच्या, त्यांच्यामुळेच उद्धव हे नाव महाराष्ट्राच्या समोर आहे. स्वतःचं कर्तृत्व मात्र शून्य आहे. मी संजय राऊतला विचारेन की तुझ्या मालकाची आणि तुझ्या मालकाच्या मुलाची बाळासाहेब ठाकरेंशिवाय नेमकी लायकी काय? याचं सर्टिफिकेट दे आणि मग दुसर्‍यांची लायकी काढायची हिंमत ठेव.



आधी याचिका मागे घ्या


मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कोणामुळे थांबली? कोर्टामध्ये केस कोणी टाकली? याची माहिती कायदा आणि कोर्टाबद्दल कळत असेल, तर उद्धव ठाकरे यांनी द्यावी. माझ्या माहितीनुसार कोर्टामध्ये हस्तक्षेप किंवा ज्या याचिका आहेत, त्यात सर्वाधिक याचिका ठाकरे गटाच्याच आहेत. त्यामुळे तुम्हाला जर निवडणूक पाहिजे असेल तर आधी याचिका मागे घ्या आणि मग मैदानात या, तुमचं वस्त्रहरण करुन तुम्हाला परत मातोश्रीमध्ये कायमस्वरुपी बसवलं, तर आम्ही जनतेसमोर जाणार नाही, असं नितेश राणे म्हणाले.



आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा


पत्रकारांनी पावसात ठाकरे कुटुंबीय मदतीसाठी ग्राऊंडवर उतरत नाहीत याबद्दल विचारले असता, नितेश राणे मिश्कीलपणे म्हणाले, अशा घाणेरड्या पाण्यामध्ये, जिथे गटाराची दुर्गंधी आहे, तिथे पेंग्विनसारखे साधे प्राणी कसे फिरु शकतात? त्यांना स्वच्छ पाणी लागतं, त्यांना एसी लागतो. म्हणून उगाच कुठल्या बिचार्‍या एका लहान पेंग्विनचा जीव घ्यायला बघू नका, नाहीतर मला तुमची तक्रार करावी लागेल, असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर  (Aditya Thackeray) निशाणा साधला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र