Nitesh Rane : वरुण सरदेसाईच आदित्य ठाकरेला संपवणार!

भाजप आमदार नितेश राणे यांचा दावा


मुंबई : जसे उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) शकुनीमामा आहे तसा वरूण सरदेसाई (Varun Sardesai ) हा आदित्य ठाकरेच्या (Aditya Thackeray) आयुष्यात शकुनीमामा आहे. संजय राऊतने उद्धवला संपवले आता वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेला संपवणार, असा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.


आज झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले की, काल रात्री समजले की आदित्य ठाकरेचा अत्यंत निकटवर्तीय, त्याचा लाडका राहुल कणाल उद्या शिवसेनेत प्रवेश करतोय. हा त्याच्यासाठी वैयक्तिक धक्का आहे.


कोविड घोटाळ्यात वरूण सरदेसाईचे नाव


याला सर्वस्वी वरूण सरदेसाई हाच जबाबदार आहे. वरूण सरदेसाईमुळे आदित्य ठाकरेजवळ कोणी उरले नाही. थोडे दिवसातच कोविड घोटाळ्यात वरूण सरदेसाईचे नाव येऊ शकते. त्या घोटाळ्यात वरून सरदेसाई आघाडीवर होता. या सरदेसाईला आवरले नाही तर उद्धव ठाकरेंची जशी अवस्था झाली तशीच अवस्था आदित्य ठाकरेची होईल.



संजय राऊत हा राष्ट्रवादीसाठीच काम करतो, वरूण सरदेसाई भाजपा किंवा शिवसेनेत जाईल


उद्धवला संपवल्यानंतर संजय राऊत हा राष्ट्रवादीसाठीच काम करतो आहे. लवकरच वरूण सरदेसाई देखिल भाजपा किंवा शिवसेनेत जाईल. आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांना कायम रिटायर करण्याचे काम संजय राऊत व वरुण सरदेसाई करत आहेत, असेही राणे म्हणाले.


आज स्वाभिमानाची वर्षपूर्ती


आज स्वाभिमानाची वर्षपूर्ती आहे. २०१९ ला बाळासाहेबांचे विचार विकून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन सरकार स्थापन झाले होते. पण ५० योध्ये सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना न्याय दिला. मागील अडीज वर्षात रखडलेली सगळी कामे करून त्यांनी गतिमान सरकार स्थापन केले आहे, असेही राणे यावेळी म्हणाले.


शरद पवार समजणे कठीण


शरद पवार यांच्याबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, शरद पवार समजायला आम्हाला १०० तर उद्धव ठाकरेंना २०० जन्म घ्यावे लागतील. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे चॉकलेट देऊन घरी कोणी बसवले? गुगली नेमका कोणाला टाकला आणि सिक्सर कोणाच्या गोलंदाजीवर टाकला?



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन