Nitesh Rane : वरुण सरदेसाईच आदित्य ठाकरेला संपवणार!

  194

भाजप आमदार नितेश राणे यांचा दावा


मुंबई : जसे उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) शकुनीमामा आहे तसा वरूण सरदेसाई (Varun Sardesai ) हा आदित्य ठाकरेच्या (Aditya Thackeray) आयुष्यात शकुनीमामा आहे. संजय राऊतने उद्धवला संपवले आता वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेला संपवणार, असा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.


आज झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले की, काल रात्री समजले की आदित्य ठाकरेचा अत्यंत निकटवर्तीय, त्याचा लाडका राहुल कणाल उद्या शिवसेनेत प्रवेश करतोय. हा त्याच्यासाठी वैयक्तिक धक्का आहे.


कोविड घोटाळ्यात वरूण सरदेसाईचे नाव


याला सर्वस्वी वरूण सरदेसाई हाच जबाबदार आहे. वरूण सरदेसाईमुळे आदित्य ठाकरेजवळ कोणी उरले नाही. थोडे दिवसातच कोविड घोटाळ्यात वरूण सरदेसाईचे नाव येऊ शकते. त्या घोटाळ्यात वरून सरदेसाई आघाडीवर होता. या सरदेसाईला आवरले नाही तर उद्धव ठाकरेंची जशी अवस्था झाली तशीच अवस्था आदित्य ठाकरेची होईल.



संजय राऊत हा राष्ट्रवादीसाठीच काम करतो, वरूण सरदेसाई भाजपा किंवा शिवसेनेत जाईल


उद्धवला संपवल्यानंतर संजय राऊत हा राष्ट्रवादीसाठीच काम करतो आहे. लवकरच वरूण सरदेसाई देखिल भाजपा किंवा शिवसेनेत जाईल. आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांना कायम रिटायर करण्याचे काम संजय राऊत व वरुण सरदेसाई करत आहेत, असेही राणे म्हणाले.


आज स्वाभिमानाची वर्षपूर्ती


आज स्वाभिमानाची वर्षपूर्ती आहे. २०१९ ला बाळासाहेबांचे विचार विकून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन सरकार स्थापन झाले होते. पण ५० योध्ये सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना न्याय दिला. मागील अडीज वर्षात रखडलेली सगळी कामे करून त्यांनी गतिमान सरकार स्थापन केले आहे, असेही राणे यावेळी म्हणाले.


शरद पवार समजणे कठीण


शरद पवार यांच्याबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, शरद पवार समजायला आम्हाला १०० तर उद्धव ठाकरेंना २०० जन्म घ्यावे लागतील. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे चॉकलेट देऊन घरी कोणी बसवले? गुगली नेमका कोणाला टाकला आणि सिक्सर कोणाच्या गोलंदाजीवर टाकला?



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या