Nitesh Rane : वरुण सरदेसाईच आदित्य ठाकरेला संपवणार!

भाजप आमदार नितेश राणे यांचा दावा


मुंबई : जसे उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) शकुनीमामा आहे तसा वरूण सरदेसाई (Varun Sardesai ) हा आदित्य ठाकरेच्या (Aditya Thackeray) आयुष्यात शकुनीमामा आहे. संजय राऊतने उद्धवला संपवले आता वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेला संपवणार, असा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.


आज झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले की, काल रात्री समजले की आदित्य ठाकरेचा अत्यंत निकटवर्तीय, त्याचा लाडका राहुल कणाल उद्या शिवसेनेत प्रवेश करतोय. हा त्याच्यासाठी वैयक्तिक धक्का आहे.


कोविड घोटाळ्यात वरूण सरदेसाईचे नाव


याला सर्वस्वी वरूण सरदेसाई हाच जबाबदार आहे. वरूण सरदेसाईमुळे आदित्य ठाकरेजवळ कोणी उरले नाही. थोडे दिवसातच कोविड घोटाळ्यात वरूण सरदेसाईचे नाव येऊ शकते. त्या घोटाळ्यात वरून सरदेसाई आघाडीवर होता. या सरदेसाईला आवरले नाही तर उद्धव ठाकरेंची जशी अवस्था झाली तशीच अवस्था आदित्य ठाकरेची होईल.



संजय राऊत हा राष्ट्रवादीसाठीच काम करतो, वरूण सरदेसाई भाजपा किंवा शिवसेनेत जाईल


उद्धवला संपवल्यानंतर संजय राऊत हा राष्ट्रवादीसाठीच काम करतो आहे. लवकरच वरूण सरदेसाई देखिल भाजपा किंवा शिवसेनेत जाईल. आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांना कायम रिटायर करण्याचे काम संजय राऊत व वरुण सरदेसाई करत आहेत, असेही राणे म्हणाले.


आज स्वाभिमानाची वर्षपूर्ती


आज स्वाभिमानाची वर्षपूर्ती आहे. २०१९ ला बाळासाहेबांचे विचार विकून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन सरकार स्थापन झाले होते. पण ५० योध्ये सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना न्याय दिला. मागील अडीज वर्षात रखडलेली सगळी कामे करून त्यांनी गतिमान सरकार स्थापन केले आहे, असेही राणे यावेळी म्हणाले.


शरद पवार समजणे कठीण


शरद पवार यांच्याबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, शरद पवार समजायला आम्हाला १०० तर उद्धव ठाकरेंना २०० जन्म घ्यावे लागतील. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे चॉकलेट देऊन घरी कोणी बसवले? गुगली नेमका कोणाला टाकला आणि सिक्सर कोणाच्या गोलंदाजीवर टाकला?



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा