Kafanchor : उद्धव ठाकरे ‘कफनचोर’

कोविड सेंटर घोटाळ्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल


मुंबई : उद्धव ठाकरेंनी जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला. आतापर्यंत मयताच्या टाळूवरील लोणी खाणारे असे म्हटले जायचे. यांनी तर त्यापुढे जाऊन बोगस डॉक्टर दाखवले आणि शवांसाठी मागवलेल्या पॅकींग पिशव्यांमध्येही घोटाळा केल्याने त्यांना ‘कफनचोर’च म्हणावे लागणार असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार हल्लाबोल केला.


कोविड काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये ठाकरेंनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्यात आता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा थेट ‘कफनचोर’ असा उल्लेख केल्याने नव्या वाकयुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल भाष्य केले.


कोविड काळातील घोटाळ्यात असे ३५ डॉक्टर समोर आले आहेत, त्यांनी कोविड सेंटरमध्ये कामासाठी केवळ अर्ज केले होते. मात्र, सेवा दिली नाही. तरीदेखील त्यांच्या नावाने पूर्ण बिल काढण्यात आले आहे. म्हणजेच कोविड सेंटरमध्ये कोण होते? असा प्रश्न उपस्थित होतो, असेही फडणवीस म्हणाले.


यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडलेल्या घोटाळ्यांची सर्व माहिती चौकशी झाल्यानंतर समोर येणार असल्याचा दावाही केला आहे. हा जनतेचा पैसा असून त्यांच्यावर आम्ही कारवाई करणारच, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.


मुंबई महापालिकेत आम्ही ठाकरे गटाच्या शिवसेनेतून २०१७ मध्येच बाहेर पडलो आहोत. ठाकरे गटाच्या गोरखधंद्यात आम्ही त्यांना साथ देणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


दरम्यान, सध्या राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना भ्रष्टाचारापासून मुक्त होण्याची अपेक्षा आहे. सर्वसामान्य नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन असून मोदींच्या योजनेत भ्रष्टाचार होत नाही. म्हणूनच सर्वसामान्य नागरिक भाजपला पाठिंबा देत असल्याचा दावाही फडणवीसांनी यावेळी केला.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.