Narayan Rane : आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव सेना पाचपेक्षा जास्त जागा जिंकणार नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा


अहमदाबाद : पुढील वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पाचपेक्षा अधिक जागा जिंकणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या पृष्ठभूमीवर अहमदाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाकरे यांनी विविध राजकीय पक्षांचा आधार घेत स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे कधीही अन्य राजकीय नेत्यांच्या कार्यालयात किंवा घरी गेले नव्हते, हे मात्र दारोदारी फिरतात, असे ते म्हणाले.


दरम्यान, मोदी सरकारच्या सेवेला, सुशासनाला आणि गरीब कल्याणाला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जनसंपर्क अभियानांतर्गत अहमदाबादच्या मणिनगर विधानसभा मतदारसंघात मराठी समाज संवाद संमेलनाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संबोधित केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात समान नागरी कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील असून केंद्र सरकारने आदिवासी बांधवांसाठी तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लघुउद्योजकांसाठी खूप काही कार्य केले आहे. आमचे सरकार त्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देण्यास निश्चितच सक्षम राहील, असेही ते म्हणाले. २०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भाजपासोबत युती केली व जिंकले, मात्र त्यानंतर भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी मिळून महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन केले. गतवर्षी जून महिन्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड पुकारले आणि शिवसेना फुटली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कोसळले. ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज राज्यात भाजपा व एकनाथ शिंदेंचे मजबूत सरकार आहे. आता उद्भव ठाकरेंच्या शिवसेनेत केवळ १३-१४ आमदार शिल्लक आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या आमदारांची संख्या पाचपेक्षा कमी दिसेल, असे ते म्हणाले..


भाजप लोकसभेच्या ४०० हून अधिक जागा जिंकून पुन्हा एकदा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. २०२४ मध्ये भाजपच्या निवडणूक प्रचारात यूसीसीचा मुद्दा केंद्रस्थानी असेल का, असे विचारले असता राणे म्हणाले की, याबाबतचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल. अनेक आदिवासी संघटना यूसीसीच्या अंमलबजावणीच्या विरोधात असल्याने आणि त्यांनी आधीच त्यांच्या चिंता व्यक्त केल्या असल्याने केंद्र सरकार त्यांना या मुद्द्यावर जिंकण्याचा प्रयत्न करेल असे राणे म्हणाले.



आमच्या सरकारने आदिवासींसाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. माझ्या एमएसएमई मंत्रालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उद्योजकांना मदत करण्यासाठी योजनाही सुरू केल्या होत्या. या प्रश्नावर आम्ही त्यांना पटवून देऊ शकू, असा माझा ठाम विश्वास आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च