Twitter: तुम्ही शेतकरी आहात का? ट्विटरला उच्च न्यायालयाने फटकारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था):  केंद्र सरकारच्या (Central Government) आदेशाविरोधात ट्विटरने (Twitter) दाखल केलेल्या याचिकेवरुन कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) ट्विटरला दणका दिला आहे. ट्विटरने काही लोकांची खाती, ट्विट आणि URL ब्लॉक करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले होते. यावर न्यायालयाने ट्विटरला तुम्ही शेतकरी नसून अब्ज डॉलर्सची कंपनी आहात त्यामुळे तुम्हाला नियम माहिती असायला हवे अशा शब्दांत ट्विटरला फटकारत ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.


सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती कृष्णा सिन्हा म्हणाले की, न्यायालयाचे मत आहे की, केंद्राकडे ट्विट आणि अकाउंट ब्लॉक करण्याचा अधिकार आहे. ट्विटर शेतकरी नसून अब्ज डॉलर्सची कंपनी आहे,  त्यांना नियम माहिती असायला हवे. यासोबतच सरकारने हा दंड ४५ दिवसांच्या आत जमा करण्यास सांगितले आहे.


ट्विटरने कोर्टात केलेल्या याचिकेत, केंद्र सरकारला सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्यासाठी सामान्य आदेश जारी करण्याचा अधिकार नाही. यासाठी सरकारला खाते ब्लॉक करण्याचे कारण सांगावे लागले, म्हणजे कंपनी यूझरला त्यांचे खाते का ब्लॉक करण्यात आले हे सांगू शकेल.


त्याच वेळी  केंद्र सरकारच्या वकिलांनी सांगितले की, राष्ट्रीय हित लक्षात घेऊन, ट्विटर ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले होते, म्हणजे लिंचिंग आणि जमावाच्या हिंसाचाराच्या घटना रोखता येतील.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

BMC : आयुक्तांची प्रत्यक्ष भेट,सभागृहात नगरसेवकांची गरमागरमी, त्यानंतरही दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दादरसह माटुंगा परिसरातील फेरीवाल्यांवरील

BMC : मुंबईत सव्वा लाख मुलींना देणार एचपीव्ही लस

- राष्ट्रीय मोहिमेचा शनिवारी झाला शुभारंभ - पहिल्या टप्प्यात महापालिका शाळांमधील सुमारे २५ हजार मुलींचा

Food delivery staff : ऑनलाईन फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी सक्तीची

मुंबई : राज्यात ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांना यापुढे कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी बंधनकारक

आता मुंबईत धावणार पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र अॅम्ब्युलन्स

- मुख्यमंत्री फडणवीस, शिंदेंनी केले सेवेचे लोकार्पण.... - 'आरबीजी फाउंडेशन-टीव्हीजेए'चा उपक्रम; लालबागचा राजा

Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम

Mumbai Traffic AI Management System : आता मुंबईच्या ट्राफ‍िक मॅनेजमेंटसाठी होणार AI ची मदत

- मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती मुंबई : एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या ट्राफ‍िक