Rain updates : येत्या २४ तासात ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार!

महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा - हवामान विभागाचे आवाहन


मुंबई : येत्या २४ तासात राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार (Rain updates) असून अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD - Indian Meteorological Department) वर्तवला आहे.


राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून बळीराजा सुखावला आहे. अनेक भागांत पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी भूस्खलनही झाले.


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरूवारी मुंबईसह रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे उद्या या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


तर दुसरीकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.





दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे परिसरात पाणी साचले. तर ठाण्यातही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. या पावसाचा फटका मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेलाही बसला आहे. मुसळधार पावसाने उपनगरीय लोकल रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.


राज्यात गेल्या ७ दिवसात चांगला पाऊस झाला असला तरी अजूनही अनेक जिल्ह्यांत पाऊस सरासरी पेक्षा खूप कमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस पाउस सक्रिय राहील. पुढील २४ तासात पावसाचा जोर आणखी वाढणार असून अलर्ट जाहीर केलेल्या जिल्ह्यातील जनतेने महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला