Mumbai Metro: मुंबईकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका!

मेट्रो प्रकल्पांभोवतीचे ३३ हजाराहून अधिक बॅरिकेड्स हटविले


८४ किमी लांबीचा रस्ता वाहतूकीसाठी केला खुला


मुंबई ( प्रतिनिधी): मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) मान्सून (Monsoon) दरम्यान रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमएमआर क्षेत्रात निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पातील (Metro Project) उन्नत मार्गाचे काम झालेल्या ठिकाणचे बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत. ६ मेट्रो प्रकल्पातील एकुण ३३ हजार ९२२ बॅरिकेडस काढल्याने दुतर्फा ८४.८०६ किलो मीटर लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी १-१ मार्गिका वाहतूकीसाठी उपलब्ध झाली असल्याने मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.


मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ३३७ किमी लांब मेट्रोचे जाळे प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत आहे. त्यापैकी मेट्रो मार्ग २ब, ४, ४अ, ५,६, ७अ आणि ९ या मेट्रो मार्गांच्या कामासाठी नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एका विशिष्ट रुंदीचा भाग बॅरीकेड्स (धातुच्या पत्र्याचे अडथळे) लावून प्रतिबंधित केला जातो. प्रकल्प पुर्ण होईपर्यंत रस्ता अडविण्यात येत असल्याने अनेकदा नागरीकांना मोठ्यावाहतुक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यावर उपाय म्हणुन प्राधिकरणाने उन्नत मार्गाचे काम झालेल्या ठिकाणचे बॅरिकेड्स काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसचे बॅरिकेड्स ठेवणे अपरिहार्य असलेल्या ठिकाणी रस्त्याची कमीत कमी जागा व्यापतील अशा पद्धतीने लावण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. यामुळे मेट्रो प्रकल्पांजवळील सुमारे ८ किमीहून लांबीचा अधिक रुंद रस्ता उपलब्ध झाला आहे. एकुण ३३५२ बॅरिकेड्स अशा पद्धतीने कमी कमी जागा व्यापतील असे पुनर्रचना करण्यात आले. आहेत. तर ६ मेट्रो प्रकल्पातील एकुण ३३ हजार ९२२ बॅरिकेडस काढल्याने दुतर्फा ८४.८०६ किलो मीटर लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. यामुळे एकूण बॅरिकेड्स पैकी सुमारे ६० टक्के बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत.


एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी याबाबत देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. मुंबई मेट्रो प्रकल्पातील ज्या ज्या टप्प्यातील कामे झाली आहेत, अशा ठिकाणचे अडथळे काढुन तो रस्ता मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे.अवघ्या महिन्याभरात प्राधिकरण्याच्या कर्मचाऱ्यानी ३० हजाराहून अधिक बॅरिकेड्स काढले आहेत. दर १५ दिवसांनी मेट्रोच्या कामाचा आणि बॅरिकेड्सचा आढावा घेतला जाईल.आणि एखाद्या ठिकाणी काम संपले की लगेचच तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन दिला जाईल. तसेच रस्त्यांलगतचे सर्व बॅरिकेड्स कमीत कमी जागेत लावून जास्तीत जास्त रस्ता रहदारी साठी मोकळा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या ठिकाणचे हटवले बॅरिकेड्स


मेट्रो मार्ग २ब

गुलमोहर रोड (जुहू सर्कल ते मिठीबाई महाविद्यालय)
एस.व्ही. रोड (विले पार्ले जंक्शन ते मिलन सबवे)
बी.के.सी रोड (कलानगर ते एमटीएनएल)
वि.एन. पूर्व मार्ग (डायमंड गार्डन ते बीएआरसी फ्लायओव्हर)
सायन- पनवेल हायवे (बीएआरसी फ्लायओव्हर ते मानखुर्द फ्लायओव्हर)



मेट्रो मार्ग ४आणि ४अ

९० फिट रोड
एल.बी. एस मार्ग (वेगवेगळ्या तीन ठिकाणचे १५ किमी बॅरिकेट काढले)
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे
घोडबंदर रोड (वेगवेगळ्या दोन ठिकाणी)
डेपो रोड
मेट्रो मार्ग ५
कापूरबावडी ते बाळकुम नाका
बाळकुम नाका ते अंजूरफाटा
अंजूरफाटा ते धामणकर नाका


मेट्रो मार्ग ६


जेव्हीएलआर (पश्चिम द्रुतगती महामार्ग जंक्शन ते महाकाली लेणी)
जेव्हीएलआर (महाकाली लेणी ते पवई तलाव)
जेव्हीएलआर (पवई तलाव- विक्रोळी - पूर्व द्रुतगती महामार्गा वर कांजूर मार्ग डेपो)
मेट्रो मार्ग ९
ओवारीपाडा जंक्शन ते दहिसर टोल
दहिसर टोल ते डेल्टा



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण