kailash mansarovar yatra: कैलास मानसरोवर दर्शन आता देशातूनच शक्य, चीनचा व्हिसा नको! कसे? घ्या जाणून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आता कैलास मानसरोवर दर्शनासाठी चीनमधून जाण्याची गरज भासणार नाही. उत्तराखंडमधील लिपुलेखच्या डोंगरावरून भाविकांना कैलास मानसरोवर पाहता येणार आहे. २०१९ मध्ये शेवटच्या वेळी लोकांनी दर्शनासाठी प्रवास केला होता. तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने कैलास मानसरोवर यात्रा पुढे ढकलली जात होती.



नुकतीच यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी आणि नवीन मार्ग काढण्यासाठी तज्ज्ञांचे पथक जुने लिपुलेख येथे पोहोचले होते. तेथील रोड मॅप, लोकांची राहण्याची व्यवस्था, दर्शनाच्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग आणि इतर गोष्टींवर त्यांनी संशोधन केले.लवकरच ते आपला अहवाल पर्यटन मंत्रालयाला सादर करतील. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू होईल. उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यात सुमारे १८ हजार फूट उंचीवरून कैलास पर्वत पाहणे पूर्णपणे शक्य आहे.



तिबेटमधील कैलास पर्वत नाभिधंगच्या अगदी वरच्या २ किलोमीटर उंच टेकडीवरून सहज दिसतो. असा दावा केला जात आहे की, हे आतापर्यंत कोणालाही माहीत नव्हते, परंतु जेव्हा काही स्थानिक लोक जुन्या लिपुलेखच्या टेकडीच्या शिखरावर पोहोचले तेव्हा तेथून कैलास पर्वत अगदी जवळ आणि दिव्य दिसला. याबाबत त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली.

कैलास पर्वतरांग काश्मीरपासून भूतानपर्यंत पसरलेली आहे. हा पर्वत ल्हा चू आणि झोंग चू यांच्यामध्ये आहे. येथे दोन जोडलेली शिखरे आहेत. यापैकी उत्तरेकडील शिखर कैलास म्हणून ओळखले जाते.



या शिखराचा आकार विशाल शिवलिंगासारखा आहे.हिंदू धर्मात त्याच्या प्रदक्षिणाला खूप महत्त्व आहे. परिक्रमा ५२ किमी आहे. १९६२ मध्ये भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तेव्हा चीनने भारताचे कैलास आणि मानसरोवर ताब्यात घेतले. आता इथे जाण्यासाठी चिनी टूरिस्ट व्हिसा घ्यावा लागेल. यामुळे कैलासला जाणे सोपे नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी