India vs Pakistan match : भाजप आणि शिवसेनेची भूमिका काय? हिंदुत्व सोडलेल्या उबाठा यांना विचारत नाही

  84

भारतात होणा-या भारत-पाकिस्तान सामन्याविरुद्ध संदीप देशपांडेंची खोचक टीका


मुंबई : यंदा भारताकडे यजमानपद असलेला क्रिकेट वर्ल्डकपचा (Crickert World cup) सामना ऑक्टोबर महिन्यात रंगणार आहे. विशेष बाब म्हणजे आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामना (India vs Pakistan match) हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) असणार आहे. याच बाबीवरुन आता राजकारण रंगत आहे. या पाकिस्तानसोबतच्या सामन्याला विरोध करण्यात येत आहे, ज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही (MNS) समावेश आहे.


मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका मांडली. "भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतात होणं हे अजिबात पटणारं नाही. बाळासाहेब ठाकरे यांनाही कदापि पटलं नसतं," असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसंच याबाबत भाजप आणि शिवसेनेची भूमिका काय असा सवालही त्यांनी विचारला आहे. यावेळेस उद्धव ठाकरेंवर मात्र निशाणा साधत 'उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे' अशी खोचक टीका त्यांनी केली.





नेमका वाद कशामुळे ?

या वादाचे मुख्य कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, पाकिस्तानच्या संघाने भारतात येऊन खेळू नये. या गोष्टीला त्यांचा विरोध होता. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवून सत्तेवर आलेले आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित असलेले राज्याचे सद्यकालीन मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोबतच ठाकरे गटदेखील बाळासाहेबांच्या विचारांशी किती एकनिष्ठ आहे, हे यातून दिसेल.


दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत, तर आशिष शेलार हे खजिनदार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी (ICC) आणि बीसीसीआयकडे (BCCI) भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती, मात्र ती विनंती फेटाळून लावण्यात आली होती. त्यामुळे बाळासाहेबांना मानणा-या दोन्ही गटांचं यावर काय म्हणणं आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही