Jagannath Rath Yatra : जगन्नाथ रथ यात्रेत वीजेच्या धक्क्याने ७ जणांचा मृत्यू

  152

उनाकोटी : त्रिपुरा मधील जगन्नाथ रथ यात्रेत (Jagannath Rath Yatra) वीजेच्या धक्काने सात जणांचा मृत्यू झाला असून दहाहून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना त्रिपुरामधील उनाकोटी जिल्ह्यातील कुमारघाट येथे घडली.


कुमारघाट येथे भगवान जगन्नाथ रथ यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथांची रथ यात्रा मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात.


परंपरेनुसार, लोखंडाने बनवलेला रथ हजारो भाविक आपल्या हाताने ओढत होते. याचवेळी हा रथ रस्त्यावरील हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आला. त्यामुळे संपूर्ण रथामध्ये वीजेचा करंट उतरला. त्यामुळे रथावरील अनेक जणांना वीजेचा धक्का बसला. त्यामध्ये सात भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १० ते १५ जण जखमी झाले आहेत.


दरम्यान, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. तर या घटनेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक भाजलेल्यांना एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच ४० टक्क्यांपेक्षा अधिक भाजलेल्यांना ७५ हजार रुपयांची मदत देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


माध्यमांशी बोलताना त्रिपुराचे उर्जा मंत्री रतन लाल नाथ यांनी सांगितले की, या घटनेच्या चौकशीचे आदेश देऊन लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर