Rasta Roko protest : तीन युवकांच्या अपघाती मृत्यूनंतर शिरवाडे फाट्यावर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

केंद्रीय राज्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट


संतप्त नागरिकांनी उड्डाण पुलाची केली मागणी


निफाड : चांदवडच्या दिशेने भरधाव वेगाने पिंपळगावकडे येणाऱ्या बसने मोटारसायकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील तीन युवकांचा गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला. या घटनेने पंचक्रोशीतील नागरिक संतप्त होऊन त्यांनी राष्ट्रीय महामार्ग तीन वरील शिरवाडे फाट्यावर तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko protest) करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी रोज एक अपघात होऊन जीवीत हानी होत असल्याने हे घटनास्थळ अपघात स्थळ घोषित करण्यासोबत उड्डाण पुल (Flyover) बांधावा अशी मागणीही यावेळी संतप्त जमावाने केली.


महेश चंद्रकांत निफाडे, सुभाष माणिकराव निफाडे आणि नितीन भास्कर निफाडे राहणार तिघेही शिरवाडे वणी फाट्यावर हे त्यांच्या दुचाकीजवळ उभे होते. तेव्हा चांदवड बाजूकडून पिंपळगावच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या एस. टी. बसने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. पिंपळगाव रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारांआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.


या प्रकरणी ज्ञानेश्वर कारभारी निफाडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बस चालक दिपक शांताराम पाटील राहणार धरनगांव जिल्हा जळगांव यांच्यावर दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत असल्याचा व अपघाताची खबर न देता पळून गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलीस हवालदार शांताराम निंबेकर हे याबाबत अधिक तपास करत आहेत.



संतप्त नागरिकांनी केले आंदोलन

सदर घटनेच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी शिरवाडे वणी येथील गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात शिरवाडे फाटा येथे नागरिक जमा झाले होते. या ठिकाणी रोज एक तरी अपघात होत आहे. त्यामुळे चांदवडकडे व पिंपळगावकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूने मोठे स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे तसेच शिरवाडे फाटा याठिकाणी लवकरात लवकर उड्डाण पूल बांधण्यात यावा, जेणेकरुन अपघाताचे प्रमाण कमी होईल व जीवित हानी टळेल अशी मागणी करण्यासाठी दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन जमावाचे सांत्वन केले.



संबंधित बातमी -


Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन