Joining Shivsena : ठाकरे गटाची गळती कायम; 'हा' नेता शिवसेनेत सामील

  158

'उठा तुमच्यावर लवकरच झोपायची वेळ येणार' नरेश म्हस्के यांनी केलं होतं सूचक ट्विट


मुंबई : वर्षभरापूर्वी महाराष्ट्राचे सद्यकालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. मात्र त्या दिवसापासून ते आजतागायत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ठाकरे गटाकडून पक्षप्रवेश होत आहेत. शिवसेना सोडून पुन्हा ठाकरे गटात मात्र कोणीही गेलेले नाही. यातच आता आणखी एक नेता ठाकरे गटातून शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे. या गोष्टीमुळे ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली असून पक्षाला लागलेली गळती कायम असल्याचे चित्र आहे.


याबाबत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आज सकाळीच एक सूचक ट्विट केलं होतं. आज 'उबाठा'चा आणखी एक मोहरा कमी होईल असं म्हणत त्यांनी 'उठा तुमच्यावर लवकरच झोपायची वेळ येणार' असा सूचक इशारा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिला होता. खरा कार्यकर्ता हा कधीही ठाकरे गटासोबत राहू शकत नाही, अशा अशायाची एक कविता नरेश मस्के यांनी ट्विट केली होती. मात्र या नेत्याचं नाव गुलदस्त्यात होतं. आता हे नाव समोर आलं असून पक्षप्रवेश देखील पार पडल्याने हा ठाकरे गटासाठीचा मोठा धक्का आहे.





संजय अगलदरे (Sanjay Agaldare) असं शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचं नाव आहे. आज वर्षा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. ठाकरे गटाचे अनिल परब यांच्या ते जवळचे आहेत. संजय अगलदरे हे तीन वेळा नगरसेवक राहिले आहेत. एकदा वरळी तर दोन वेळा खार दांडा येथून ते नगरसेवक झाले आहेत.


संजय अगलदरे यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर आपलं बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं सरकार स्थापन झाल्यानंतर थांबलेली विकासकामे सुरू झाली आहेत, असे शिंदे-फडणवीस सरकारबद्दल गौरवोद्गार काढले. आपलं सरकार आलं आणि चांगल्या सेवा मिळाव्या यासाठी अनेक गोष्टी केल्या असंही त्यांनी म्हंटलं.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची