आळंदी : आळंदी येथील इंद्रायणी नदी (Indrayani River) जलप्रदूषणामुळे पुन्हा एकदा फेसाळलेली दिसून आली. इंद्रायणी नदी काठच्या गावातील मैलामिश्रित सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. त्यामुळे वारंवार इंद्रायणी नदी फेसाळली दिसून येत आहे.
नदीपात्रातील हा फेस हवेमध्ये उडून इतरत्र पडताना दिसत होता. सततच्या या जलप्रदूषणाबाबत इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने नाराजी व्यक्त केली आहे. ६ जून रोजी जिल्हाधिकारी (पुणे) यांनी जलप्रदूषणाबाबत बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये जलप्रदूषणा बाबतचा अहवाल दर महिन्याला मिळावा, असे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले असल्याची माहिती इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी दिली.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra