Eknath Khadse - Gulabrao Patil : आमदार एकनाथ खडसे- मंत्री गुलाबराव पाटलांमध्ये तडजोड; अब्रू नुकसानीचा दावा मागे

गुलाबरावांनी दिले होते चहापानाचे निमंत्रण


जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गुलाबरावांविरोधात ५ कोटींचा अब्रू नुकसानीचा आरोप दाखल केला होता. मात्र आता या दोन नेत्यात तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे.


जिल्ह्यात सन २०१६ मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीदरम्यान प्रचार सभांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मात्र या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याने आपली समाजात बदनामी झाली, या कारणाने आमदार खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा जळगाव न्यायालयात दाखल केला होता. या खटल्यात आज जळगाव जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यासाठी मंत्री गुलाबराव पाटील तसेच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी दोघांमध्ये तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला.



गुलाबरावांनी दिले होते चहापानाचे निमंत्रण

अब्रुनुकसानीच्या खटल्यात गैरहजर राहिल्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जिल्हा सत्र न्यायालयाने खर्चापोटी ५०० रुपयांचा दंड केला होता. पाटील यांनी माफी मागितल्यास दावा मागे घेण्यासंदर्भात विचार करता येईल, असे खडसे यांनी म्हटले होते. तर माफी मागणं आणि न मागणं हा अहंपणाचा विषय आहे. खडसे हे माझ्यापेक्षा मोठे आहेत, ते कधीही आले, तर त्यांच्या पाया पडलो आहे. त्यांना माफी मागितल्याने काही मोठेपणा वाटत असल्यास त्यांनी चहापाण्यासाठी आपल्याकडे यावे, असे आमंत्रण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देत एकप्रकारे नमते घेतले होते. अखेर आज या प्रकरणात तडजोड होऊन दावा मागे घेण्यात आला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे