Electricity Bill : विजेच्या बचतीसाठी सरकारने काढला 'हा' नियम

जाणून घ्या सामान्य माणसांना याचा किती फायदा


नवी दिल्ली : हल्ली विजेच्या वाढत्या वापरासोबतच निष्काळजीपणा देखील वाढला आहे. पंखा, एसी, लाईट वापर नसताना बंद करायचं हे लोकं अगदी सहज विसरतात. परिणामी विजेचे बिलही (Electricity Bill) जास्त येते व विजेचा अपव्ययही होतो. या गोष्टी टाळण्यासाठीच केंद्र सरकारकडून (Central Government) वीज वापरकर्त्यांसाठी नवा नियम लागू करण्यात येणार आहे. या नियमामुळे लोकांना वीज वापराचं व्यवस्थापन करता यावं, असा हेतू आहे. या नियमाविषयी आधिक जाणून घेऊयात.


केंद्र सरकार विचार करत असलेल्या नवीन नियमानुसार वीज उपभोक्त्यांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळं बिल आकारण्यात येईल. याअंतर्गत ग्राहकांसाठी दिवसा आणि रात्रीचा वेगळा वीज दर आकारणारा नवीन टाइम ऑफ डे (TOD) वीज टॅरिफ लागू केला जाईल. केंद्र सरकार लवकरच वीज ग्राहकांचे हक्क नियम २०२० (Electricity Consumer Rights Rules 2020) मध्ये सुधारणा करणार आहे.


या नवीन दर धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर ग्राहकांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळं वीज बिल द्यावं लागेल. दिवसा सौर उर्जेवर वीज पुरवठा केला जाईल, यामुळे दिवसा वीज दर कमी असेल. त्यामुळे दिवसा वीज बिलात ग्राहकांची २० टक्के बचत होऊ शकते. पण रात्री वीज बिल १० ते २० टक्क्यांनी महागणार आहे. याचं कारण म्हणजे रात्रीच्या वेळेत कोळशावर तयार झालेला वीजपुरवठा करण्यात येईल जो तुलनेने महाग असतो.



असा निर्णय घेण्यामागचं कारण काय?

एकीकडे कोळशावर आधारित थर्मल पॉवर प्लांट्समधून उत्पादित होणारी वीज महाग होत आहे, तर दुसरीकडे हरित ऊर्जेचा प्रचार करून ग्राहकांना सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रवृत्त करावे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. आता घेतलेल्या निर्णयामुळे २४ तास एकाच दराने वीज बिल भरण्याऐवजी ग्राहक दिवसातील वेगवेगळ्या वेळेनुसार वेगवेगळी वीजबिल भरतील. अशा प्रकारे ते त्यांचा वीज वापराचं व्यवस्थापन करू शकतात.


याबरोबरच रात्रीच्या वेळेत कोळशावर तयार झालेला वीजपुरवठा करण्यात येईल त्यामुळे दर जास्त असेल. रात्रीच्या वेळी जास्त वीज वापरल्यास, एसी आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणे वापरल्यास सामान्यपेक्षा जास्त वीज मोजावी लागेल. कारण पीक अवर्समध्ये (Peak Hours) टॅरिफ १०-२० टक्के जास्त असेल. यामुळे कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रांपासून बनवलेल्या विजेची मागणी कमी होईल. सौर तासांमधील वीज नियोजन करून ग्राहक बिलांमध्ये 20 टक्क्यांपर्यंत बचत करू शकतात.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

South Delhi Building Collapse : दक्षिण दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली; १२ जणांची सुटका, साकेत परिसरात बचावकार्य सुरूच

नवी दिल्ली (South Delhi Building Collapse)  : दक्षिण दिल्लीतील साकेत मेट्रो स्थानकाजवळ शनिवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली.

जपानकडून भारतीय आंब्यावर बंदी, तर चीनने तांदळाचे ७० साठे परतवले

दुहेरी फटका ! निर्यात प्रक्रिया अधिक कडक करण्याची गरज नवी दिल्ली :भारतीय आंबा निर्यातदारांना यंदाच्या हंगामात

आयएसआय-दाऊद नेटवर्कशी संबंधित दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई करत पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, दाऊद इब्राहिम

Rajasthan Sandstorm : राजस्थानात वाळूच्या वादळाचा कहर! भरदिवसा अंधार, ताशी ७० किमी वेगाने धुळीचा तांडव; वाहतूक ठप्प

जयपूर : राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आज (३० मे) निसर्गाचा भीतीदायक आणि आश्चर्यकारक अनुभव पाहायला

IPL Final 2026 : RCB vs GT फायनल : अकासा एअरकडून मुंबई आणि बंगळुरूहून अहमदाबादसाठी विशेष विमानांची घोषणा!

मुंबई : जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) चा अंतिम सामना आता

CUET-UG 2026 : NEET पेपरफुटीचा वाद सुरू असतानाच CUET परीक्षेत मोठा गोंधळ! तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना २ तास प्रतीक्षा; पालक-विद्यार्थ्यांचा संताप

देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, आता कॉमन