Electricity Bill : विजेच्या बचतीसाठी सरकारने काढला 'हा' नियम

जाणून घ्या सामान्य माणसांना याचा किती फायदा


नवी दिल्ली : हल्ली विजेच्या वाढत्या वापरासोबतच निष्काळजीपणा देखील वाढला आहे. पंखा, एसी, लाईट वापर नसताना बंद करायचं हे लोकं अगदी सहज विसरतात. परिणामी विजेचे बिलही (Electricity Bill) जास्त येते व विजेचा अपव्ययही होतो. या गोष्टी टाळण्यासाठीच केंद्र सरकारकडून (Central Government) वीज वापरकर्त्यांसाठी नवा नियम लागू करण्यात येणार आहे. या नियमामुळे लोकांना वीज वापराचं व्यवस्थापन करता यावं, असा हेतू आहे. या नियमाविषयी आधिक जाणून घेऊयात.


केंद्र सरकार विचार करत असलेल्या नवीन नियमानुसार वीज उपभोक्त्यांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळं बिल आकारण्यात येईल. याअंतर्गत ग्राहकांसाठी दिवसा आणि रात्रीचा वेगळा वीज दर आकारणारा नवीन टाइम ऑफ डे (TOD) वीज टॅरिफ लागू केला जाईल. केंद्र सरकार लवकरच वीज ग्राहकांचे हक्क नियम २०२० (Electricity Consumer Rights Rules 2020) मध्ये सुधारणा करणार आहे.


या नवीन दर धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर ग्राहकांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळं वीज बिल द्यावं लागेल. दिवसा सौर उर्जेवर वीज पुरवठा केला जाईल, यामुळे दिवसा वीज दर कमी असेल. त्यामुळे दिवसा वीज बिलात ग्राहकांची २० टक्के बचत होऊ शकते. पण रात्री वीज बिल १० ते २० टक्क्यांनी महागणार आहे. याचं कारण म्हणजे रात्रीच्या वेळेत कोळशावर तयार झालेला वीजपुरवठा करण्यात येईल जो तुलनेने महाग असतो.



असा निर्णय घेण्यामागचं कारण काय?

एकीकडे कोळशावर आधारित थर्मल पॉवर प्लांट्समधून उत्पादित होणारी वीज महाग होत आहे, तर दुसरीकडे हरित ऊर्जेचा प्रचार करून ग्राहकांना सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रवृत्त करावे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. आता घेतलेल्या निर्णयामुळे २४ तास एकाच दराने वीज बिल भरण्याऐवजी ग्राहक दिवसातील वेगवेगळ्या वेळेनुसार वेगवेगळी वीजबिल भरतील. अशा प्रकारे ते त्यांचा वीज वापराचं व्यवस्थापन करू शकतात.


याबरोबरच रात्रीच्या वेळेत कोळशावर तयार झालेला वीजपुरवठा करण्यात येईल त्यामुळे दर जास्त असेल. रात्रीच्या वेळी जास्त वीज वापरल्यास, एसी आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणे वापरल्यास सामान्यपेक्षा जास्त वीज मोजावी लागेल. कारण पीक अवर्समध्ये (Peak Hours) टॅरिफ १०-२० टक्के जास्त असेल. यामुळे कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रांपासून बनवलेल्या विजेची मागणी कमी होईल. सौर तासांमधील वीज नियोजन करून ग्राहक बिलांमध्ये 20 टक्क्यांपर्यंत बचत करू शकतात.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

India : भारत रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवणार

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून अमेरिकेने रशियन तेल खरेदीवर भारतावर निर्बंध लादले होते भारतावरील हे

Navapur : नवापूर एमआयडीसीत वनविभागाचा मोठा दणका; बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

नवापूर : नवापूर एमआयडीसी (MIDC) परिसरात बिबट्या या संरक्षित वन्यप्राण्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा

Women’s Reservation Bill : महिला आरक्षणामुळे दक्षिणी राज्यांचे कोणतेही नुकसान नाही - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिण भारतातील

Akasa Air and SpiceJet aircraft collide : दिल्ली विमानतळावर अकासा एअर आणि स्पाईसजेटच्या विमानाची टक्कर

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर अकासा एअरचे विमान VT-YBA आणि स्पाईसजेटचे विमान VT-SLB यांची टक्कर झाली. फ्लाइटराडार24 च्या

Women’s Reservation Bill : काय आहे 'नारी शक्ती वंदन' कायदा ? जाणून घ्या महिला आरक्षणाचे संपूर्ण स्वरूप आणि फायदे

तीन प्रमुख घटनादुरुस्ती विधेयके सादर नवी दिल्ली : आज, १६ एप्रिल २०२६ रोजी, केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या

Nari Shakti Vandan : ही मोदींची गॅरंटी... महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींचे विरोधकांना भर सभागृहात खडेबोल

नवी दिल्ली : सध्या संसदेच्या विशेष अधिवेशनात 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'वर (महिला आरक्षण विधेयक) ऐतिहासिक चर्चा