Electricity Bill : विजेच्या बचतीसाठी सरकारने काढला 'हा' नियम

जाणून घ्या सामान्य माणसांना याचा किती फायदा


नवी दिल्ली : हल्ली विजेच्या वाढत्या वापरासोबतच निष्काळजीपणा देखील वाढला आहे. पंखा, एसी, लाईट वापर नसताना बंद करायचं हे लोकं अगदी सहज विसरतात. परिणामी विजेचे बिलही (Electricity Bill) जास्त येते व विजेचा अपव्ययही होतो. या गोष्टी टाळण्यासाठीच केंद्र सरकारकडून (Central Government) वीज वापरकर्त्यांसाठी नवा नियम लागू करण्यात येणार आहे. या नियमामुळे लोकांना वीज वापराचं व्यवस्थापन करता यावं, असा हेतू आहे. या नियमाविषयी आधिक जाणून घेऊयात.


केंद्र सरकार विचार करत असलेल्या नवीन नियमानुसार वीज उपभोक्त्यांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळं बिल आकारण्यात येईल. याअंतर्गत ग्राहकांसाठी दिवसा आणि रात्रीचा वेगळा वीज दर आकारणारा नवीन टाइम ऑफ डे (TOD) वीज टॅरिफ लागू केला जाईल. केंद्र सरकार लवकरच वीज ग्राहकांचे हक्क नियम २०२० (Electricity Consumer Rights Rules 2020) मध्ये सुधारणा करणार आहे.


या नवीन दर धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर ग्राहकांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळं वीज बिल द्यावं लागेल. दिवसा सौर उर्जेवर वीज पुरवठा केला जाईल, यामुळे दिवसा वीज दर कमी असेल. त्यामुळे दिवसा वीज बिलात ग्राहकांची २० टक्के बचत होऊ शकते. पण रात्री वीज बिल १० ते २० टक्क्यांनी महागणार आहे. याचं कारण म्हणजे रात्रीच्या वेळेत कोळशावर तयार झालेला वीजपुरवठा करण्यात येईल जो तुलनेने महाग असतो.



असा निर्णय घेण्यामागचं कारण काय?

एकीकडे कोळशावर आधारित थर्मल पॉवर प्लांट्समधून उत्पादित होणारी वीज महाग होत आहे, तर दुसरीकडे हरित ऊर्जेचा प्रचार करून ग्राहकांना सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रवृत्त करावे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. आता घेतलेल्या निर्णयामुळे २४ तास एकाच दराने वीज बिल भरण्याऐवजी ग्राहक दिवसातील वेगवेगळ्या वेळेनुसार वेगवेगळी वीजबिल भरतील. अशा प्रकारे ते त्यांचा वीज वापराचं व्यवस्थापन करू शकतात.


याबरोबरच रात्रीच्या वेळेत कोळशावर तयार झालेला वीजपुरवठा करण्यात येईल त्यामुळे दर जास्त असेल. रात्रीच्या वेळी जास्त वीज वापरल्यास, एसी आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणे वापरल्यास सामान्यपेक्षा जास्त वीज मोजावी लागेल. कारण पीक अवर्समध्ये (Peak Hours) टॅरिफ १०-२० टक्के जास्त असेल. यामुळे कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रांपासून बनवलेल्या विजेची मागणी कमी होईल. सौर तासांमधील वीज नियोजन करून ग्राहक बिलांमध्ये 20 टक्क्यांपर्यंत बचत करू शकतात.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

भारतीय सैनिकांना मिळाल्या शत्रूला दणका देणार प्रहार लाईट मशिन गन

ग्वाल्हेर : भारतीय लष्कराचे सामर्थ्य आता आणखी वाढणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेल्या तब्बल दोन हजार

Middle East War Beer Price Hike : आता 'चीअर्स' करणं पडणार महाग! मध्य-पूर्वेतील युद्धामुळे बियर महागणार ? वाचा सविस्तर

मध्य-पूर्वेतील वाढत्या लष्करी संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे ढग दाटले असून, त्याचे गंभीर परिणाम आता सर्वच

कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत.

लडाखमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; श्रीनगर-लेह महामार्ग बंद

लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली.

महाराष्ट्र आणि गोव्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत ५९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्राप्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि

एस-400 मिसाइलसह संरक्षण उपकरणांच्या खरेदीस मंजुरी

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हवाई दलासाठी रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टमची अतिरिक्त बॅटरी खरेदी