CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ‘एक तीर से दो निशाने’

Share

तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच एकनाथ शिंदे पोहोचले पंढरपुरात

पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पंढपुरला अचानक भेट देऊन आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री हे आषाढी एकादशीच्या दिवशी विशेष अतिथी असतात. त्यांच्याच हस्ते विठ्ठलाची पूजा देखील केली जाते. असे असूनही त्यांनी थेट आषाढी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

महाराष्ट्रात बीआरएस आपले बस्तान मांडण्यासाठी हातपाय पसरत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी (२७ जून) रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) त्यांच्या मंत्रिमंडळासहित आमदार आणि खासदारांना घेऊन सोलापुरात दाखल होणार आहेत. पण त्याआधीच मुख्यमंत्री शिंदे रविवारी (२५ जून) रोजी नांदेडमधून थेट विमानाने सोलापुरात पोहचले. तसेच त्यांनी पंढरपुरात पाहणी करुन वारकऱ्यांशी देखील संवाद साधला. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पंढरपूरमधील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. डांबरी रस्ते झाले पाहिजेत यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे. दर्शनासाठी वारकऱ्यांची रांग लागते तिथे त्यांना त्रास होऊ नये यासाठी मंडप उभा केलेला आहे. पाऊस आणि ऊनापासून संरक्षण व्हावे याची काळजी घेतली आहे. हे सगळे नियोजनबद्ध केले आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

पिण्याचे स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे, ठिकठिकाणी पंखे लावण्यात आले आहेत, महिलांसाठी स्नानगृह मोठ्या प्रमाणात उपलब्ध केली आहेत, चेजींग रुम आहेत, टॉलेटची व्यवस्था केली आहे. वारीच्या काळात स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी येणार आहेत. त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. तसेच त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. अनेक ठिकाणी कॅम्प लावण्यात आले आहेत. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली आहे. कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची काळजी घेतली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान वारकऱ्यांना दिलेल्या सुविधांसाठी ते खूष असून त्यामुळे आपण देखील समाधानी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पंढपूर देखील खड्डेमुक्त झाले असून आपण दिलेला निधी पूर्णत्वास गेल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी चंद्रभागा स्वच्छता व पंढरपुरातील इतर वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा देखील आढावा घेतला. तर चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्याविषयी बोलताना त्यांनी म्हटले की, ‘प्रत्येक विठ्ठल भक्ताला दर्शन घेण्याचा अधिकार आहे, विठुराया सर्वांचा आहे.’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले जखमी

मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष काही क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र भारी ठरला. खरंतर, भारतीय…

2 hours ago

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

9 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

10 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

11 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

11 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

12 hours ago