Ashish Shelar : 'मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे... इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन'

आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका


मुंबई : मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यावरुन भाजप (BJP) आणि ठाकरे गटात (Thackeray Gat) चांगलेच राजकारण तापले आहे. ठाकरे गटाकडून नालेसफाईवर टीका करण्यात येत आहे तर भाजपचे नेते यावर आक्रमक होऊन आपली भूमिका मांडत आहेत. यातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) नालेसफाई झाली नसल्याचा आरोप केला. यावर भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विटद्वारे आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.


'तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात. उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली', असं म्हणत आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.



युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात की चेरापुंजीची?

पुढे आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची एक व्हिडीओ क्लिप शेअर करत आशिष शेलार म्हणाले की, 'म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला ४०० मिमी पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले. मुंबईत एका तासात ४०० मिमी? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत २६ जुलै २००५ ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता.' यामुळे आदित्य ठाकरेंच्या आपल्या कार्यकाळाच्या वेळी ४०० मिमी प्रतितास पाऊस होत होता, तेव्हा मी, महापौर किंवा उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरुन लोकांचे प्रश्न सोडवत होतो, या विधानाला आशिष शेलारांनी चपराक लगावली आहे.





इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन

आशिष शेलार यांनी पुढे म्हटले की, 'यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर! मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना... इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन, वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी!' या शब्दांत आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

BMC : धारावी, काळा किल्ला बेस्ट बस आगाराची जागा धारावी विकास प्रकल्पासाठीसाठी हस्तांतरीत

महापालिका सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर मुंबई : धारावी (Dharavi) बस डेपोची जागा पीपीपी तत्त्वावर धारावी विकास

BMC News : तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सलग दुसऱ्यांदा महापौरांकडून चूक

सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा आला अडचणीत घाटकोपरमधील रस्ता रेषेसंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची महापौरांना

Chembur Tree Collapse : चेंबूरच्या झाड दुर्घटनेच्या अहवाल सत्ताधाऱ्यांनाच अमान्य

अहवालाची फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश सभागृहनेत्यांनी अहवालाची प्रतच सभागृहात फाडत

FDA : मुंबईच्या प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; परवाना निलंबित

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' (Safe Food, Safe Maharashtra) या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र