World Cup: भारताने जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकाला ४० वर्षे पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रीडा चाहत्यांच्या मनात कायमचा कोरून राहिलेला सुवर्ण क्षण म्हणजे १९८३ साली भारतीय संघाने जिंकलेला विश्वचषक (India's first world cup) होय. या विश्वचषक विजयाला आज ४० वर्षे पूर्ण झाली. २५ जून १९८३ रोजी अंतिम सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजला पराभूत करत प्रथमच विश्वचषक जिंकला होता.


४० वर्षांपूर्वी याच दिवशी भारतीय संघाने इंग्लंडमधील ऐतिहासिक मैदान असलेल्या लॉर्ड्सवर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला होता. कर्णधार कपिल देव, उपकर्णधार मोहिंदर अमरनाथ, सुनील गावसकर, यष्टिरक्षक सय्यद किरमानी, रॉजर बिन्नी, मदन लाल, संदीप पाटील, बलविंदर सिंग संधू, कृष्णमाचारी श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, सुनील व्हॅल्सन हे दिग्गज क्रिकेटपटू विश्वचषक विजयी संघात होते.


२५ जून १९८३ रोजी लॉर्ड्स ग्राउंडवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. या सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडिया १८३वर ऑलआऊट झाली. मात्र अप्रतिम गोलंदाजी करत भारताने हा सामना जिंकला होता.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Asia Cup 2025 : पाकिस्तान 'सुपर-४' मध्ये, आता पुन्हा भारताशी होणार 'महामुकाबला'

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने यूएईचा ४१ धावांनी पराभव करत 'सुपर-४' फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले

पाकिस्तानच्या 'खोट्या' फुटबॉल संघाचा जपानमध्ये पर्दाफाश

इस्लामाबाद: एका फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या 'बनावट' फुटबॉल संघाला जपानी

Asia Cup 2025: पाकिस्तानची नाटकं काही चालेना, UAE विरुद्ध सामन्याला ९ वाजता होणार सुरूवात

दुबई: आशिया कप २०२५मध्ये आज १०वा सामना पाकिस्तान आणि यजमान यूएई यांच्यात खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याच्या

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी

चंदीगड : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना चमकदार कामगिरी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आणि

Asia Cup 2025 : सुपर 4 मध्ये पोहोचताच टीम इंडियाला मिळाली आनंदाची आणखी एक बातमी

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळत असलेला भारतीय संघ एशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीत पोहोचला आहे. आता भारत

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स