TCS Job Scam: भारतातील 'या' सर्वात मोठ्या आयटी कंपनीत तब्बल १०० कोटींचा नोकरभरती घोटाळा

मुंबई: टीसीएस (Tata Consultancy Services Ltd) या भारतातील बड्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीत नोकरीच्या बदल्यात लाचखोरी झाल्याचं उघड झालं आहे. जवळपास १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी टीसीएस (TCS) कंपनीनं चार अधिकाऱ्यांना बडतर्फ केलंय. त्यासोबतच तीन स्टाफिंग फर्मवर बंदी देखील घातली आहे. मात्र, टीसीएसने यावर असा घोटाळा झालाच नसल्याचं घुमजाव केलं आहे.


टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services Ltd (TCS)) या बड्या आयटी कंपनीत लाच देऊन नोकर भरती होत असल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. एका अहवालानुसार, कंपनीचे काही वरिष्ठ अधिकारी त्यांच्या उमेदवारांना नोकऱ्या देण्याच्या बदल्यात स्टाफिंग फर्म्सकडून लाच घेत होते. अनेक वर्षांपासून कंपनीत हे प्रकार सुरु होते. आता घोटाळा उघडकीस आल्यानंतर टीसीएसने यावर ता कारवाई केली. गेल्या ३ वर्षांत टीसीएसनं कंत्राटी भरतीसह ३ लाख लोकांना कामावर घेतले आहे.


कोणताही घोटाळा झाला नसून काही कर्मचारी आणि स्टाफिंग फर्मकडून नियमांचा भंग झाला आहे, असं म्हणत कंपनीतील भरती प्रक्रिया रिसोर्स मॅनेजमेंट ग्रूपकडून हाताळली जात नाही, असं स्पष्टीकरण टीसीएसने दिलंय. सोबतच कंपनीतील कोणताही प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती यात सहभागी असल्याचं आढळलं नसल्याचं टीसीएसने म्हटलंय. पण, असं असलं तरी दुसरीकडे विविध प्रकल्पांसाठी माणसं उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आरएमजीवर असल्याचं टीसीएसकडून मान्य करण्यात आलंय.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

मुंबईकरांनी दिवाळीत फटाक्यांसह केला कचरा, महापालिकेने तब्बल ३,००० टन जमा केला..

मुंबई (खास प्रतिनिधी): दीपावलीच्या पूर्वी करण्यात आलेली साफसफाई आणि या सणाच्या काळात भेटवस्तू तसेच फटाक्यांचा

हवामान खात्याचा महाराष्ट्राला आज आणि उद्यासाठी पावसाचा इशारा

मुंबई : यंदा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अती पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभी पिकं वाहून गेली. केंद्र

आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या मोहम्मद सलीम शेखला दुबईतून अटक, मुंबई पोलीस क्राइम ब्रॅंचची मोठी कामगिरी!

मुंबई: मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश

मध्य रेल्वेचा ९ दिवस मेगाब्लॉक! 'या' स्थानकांदरम्यान वाहतूक राहणार बंद, लांबपल्ल्याच्या लोकल ट्रेनला फटका

मुंबई: कर्जत स्थानकाच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेने ९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक २४

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या