TCS Job Scam: भारतातील ‘या’ सर्वात मोठ्या आयटी कंपनीत तब्बल १०० कोटींचा नोकरभरती घोटाळा

Share

मुंबई: टीसीएस (Tata Consultancy Services Ltd) या भारतातील बड्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीत नोकरीच्या बदल्यात लाचखोरी झाल्याचं उघड झालं आहे. जवळपास १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी टीसीएस (TCS) कंपनीनं चार अधिकाऱ्यांना बडतर्फ केलंय. त्यासोबतच तीन स्टाफिंग फर्मवर बंदी देखील घातली आहे. मात्र, टीसीएसने यावर असा घोटाळा झालाच नसल्याचं घुमजाव केलं आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services Ltd (TCS)) या बड्या आयटी कंपनीत लाच देऊन नोकर भरती होत असल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. एका अहवालानुसार, कंपनीचे काही वरिष्ठ अधिकारी त्यांच्या उमेदवारांना नोकऱ्या देण्याच्या बदल्यात स्टाफिंग फर्म्सकडून लाच घेत होते. अनेक वर्षांपासून कंपनीत हे प्रकार सुरु होते. आता घोटाळा उघडकीस आल्यानंतर टीसीएसने यावर ता कारवाई केली. गेल्या ३ वर्षांत टीसीएसनं कंत्राटी भरतीसह ३ लाख लोकांना कामावर घेतले आहे.

कोणताही घोटाळा झाला नसून काही कर्मचारी आणि स्टाफिंग फर्मकडून नियमांचा भंग झाला आहे, असं म्हणत कंपनीतील भरती प्रक्रिया रिसोर्स मॅनेजमेंट ग्रूपकडून हाताळली जात नाही, असं स्पष्टीकरण टीसीएसने दिलंय. सोबतच कंपनीतील कोणताही प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती यात सहभागी असल्याचं आढळलं नसल्याचं टीसीएसने म्हटलंय. पण, असं असलं तरी दुसरीकडे विविध प्रकल्पांसाठी माणसं उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आरएमजीवर असल्याचं टीसीएसकडून मान्य करण्यात आलंय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

Palghar news : रस्त्यातील खड्ड्यात आदळली बाईक! हातातून निसटल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू

मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…

3 hours ago

सक्शन पंपात बिघाड, कांदिवली तुंबली!

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…

5 hours ago

CM Eknath Shinde : गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…

5 hours ago

ST Bus : मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प! जाणून घ्या एसटी बस कुठून व कधी सुटणार?

हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…

5 hours ago

Navi Mumbai news : धावत्या लोकलमधून महिला पडली! जीव वाचला पण गुडघ्यापासून दोन्ही पाय तुटले

मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…

6 hours ago

Mumbai Railway stations : मुंबईच्या रेल्वे स्थानकांबाबत आज विधानपरिषदेत होणार महत्त्वाचा ठराव!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…

6 hours ago