Rashtravadi Congress Party : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही ठीक की पक्षांतर्गत दबाव गट?

अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी समर्थक आमदारांचा दबाव


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Rashtravadi Congress Party) कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची निवड झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा रंगली होती. तेव्हा यामध्ये काहीच तथ्य नाही, असं म्हणत अजित पवारांनी या बातम्या धुडकावून लावल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाऐवजी पक्षांतर्गत महत्त्वाचे पद देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आता अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करा, अशी मागणी अजित पवार यांच्या समर्थक आमदारांनी केल्याने पक्षांतर्गत दबाव गट निर्माण होतोय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेत अजित पवारांना देश पातळीवर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. यावर विरोधी पक्षनेत्याची राज्य पातळीवर खूप मोठी जबाबदारी माझ्यावर असल्याचे अजित पवार म्हणाले होते. मात्र मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, आता मला संघटनेत कोणतही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईल, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी केलं. त्यानुसार आता त्यांच्या समर्थक आमदारांनी देखील त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी करत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली. मराठा समाजाकडे एक पद असेल तर दुसरे पद हे इतर समाज किंवा ओबीसी समाजाला देण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली. त्यानुसार मला संधी दिली तर मला हे काम करायला आवडेल, असे देखील छगन भुजबळ म्हणाले होते. त्यामुळे अजित पवार यांची पक्षांतर्गत कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या समर्थकांच्या मागणीने जोर धरल्याने पक्षांतर्गत दबाव गट निर्माण होत असल्याची चिन्हे आहेत.



Comments
Add Comment

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल

खरडलेल्या शेतजमिनींसाठी मिळणार माती, गाळ, मुरूम, मोफत !

मुंबई : अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, कंकर

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ