Rain of Mumbai : मुंबईकरांनो... आता छत्री घेऊनच घराबाहेर पडा!

मुंबई : काय हा पाऊस, नुसती रिपरिप लावली आहे!, धड पडतही नाही आणि धड थांबतही नाही, उगाच रस्त्यावर चिखल करुन ठेवलाय, या पावसाला पडायचंच होतं तर नीट पडायचं ना! आज छत्री घेऊ की नको? असं म्हणणार्‍या मुंबईकरांवर शेवटी छत्री घेऊनच घराबाहेर पडायची वेळ आली आहे, असं म्हणावं लागेल. इतके दिवस हुलकावणी देणारा पाऊस आज चांगला तासभर पडला. त्यामुळे छत्री न आणलेल्यांची मुंबईच्या रस्त्यांवर चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.


तसं मुंबईकरांच्या नशिबी कायम पाऊस हुलकावणीच देऊन जातो. पण यंदा पावसाने जरा आणखी उशीर केला. असं असलं तरी पावसाची मजा मात्र कायम आहे. आज पाऊस पडल्यामुळे लोकलही काहीशा उशिरा धावत होत्या. त्यामुळे कामाला जायला उशीर झालेला असला तरी पावसाचं पाणी अखेर अंगाला लागलं या गोष्टीनेच मुंबईकर सुखावले आहेत. त्याचेच हे काही सुंदर क्षण टिपले आहेत अरुण पाटील यांनी...



आपल्याकडे छत्री असतानाही मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या छत्रीतून एकत्र जाण्याची मजाच वेगळी! असे क्षण काॅलेजजीवनातच अनुभवता येतात. आज सकाळी काॅलेजला जाणारी काही तरुण मुलं-मुली एकाच छत्रीतून जाताना दिसली.



अचानक आलेल्या पावसात छत्री नसल्याने प्लास्टिक, पुठ्ठा वापरत लोकांनी पाण्यापासूम आपला बचाव केला.




त्यामुळे मुंबईतला पाऊस हा कायम लोकांची त्रेधा तिरपीट करायला येतो, असं म्हणायला हरकत नाही.



मुंबईच्या भिजलेल्या रस्त्यांवरुन धावणार्‍या गाड्या स्वच्छ धुवून निघाल्या.

पावसाने शेवटी मुंबईकरांना आपलं आगमन झाल्याचं कळवलं आहे, त्यामुळे मुंबईकरांना आता पावसाळा असेपर्यंत कायम छत्री सोबत ठेवावी लागणार आहे. हा पाऊस असाच बरसत राहावा आणि कोकणात चिंतेत असलेल्या शेतकर्‍यांनादेखील त्याने लवकरात लवकर आनंद द्यावा, हीच वरुणराजाकडे प्रार्थना!



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा संपन्न! राजकारण सक्रीय असलेल्या कुटुंबाची होणार थोरली सून

मुंबई: बिग बॉस मराठी ४ मधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ