Rain of Mumbai : मुंबईकरांनो... आता छत्री घेऊनच घराबाहेर पडा!

  306

मुंबई : काय हा पाऊस, नुसती रिपरिप लावली आहे!, धड पडतही नाही आणि धड थांबतही नाही, उगाच रस्त्यावर चिखल करुन ठेवलाय, या पावसाला पडायचंच होतं तर नीट पडायचं ना! आज छत्री घेऊ की नको? असं म्हणणार्‍या मुंबईकरांवर शेवटी छत्री घेऊनच घराबाहेर पडायची वेळ आली आहे, असं म्हणावं लागेल. इतके दिवस हुलकावणी देणारा पाऊस आज चांगला तासभर पडला. त्यामुळे छत्री न आणलेल्यांची मुंबईच्या रस्त्यांवर चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.


तसं मुंबईकरांच्या नशिबी कायम पाऊस हुलकावणीच देऊन जातो. पण यंदा पावसाने जरा आणखी उशीर केला. असं असलं तरी पावसाची मजा मात्र कायम आहे. आज पाऊस पडल्यामुळे लोकलही काहीशा उशिरा धावत होत्या. त्यामुळे कामाला जायला उशीर झालेला असला तरी पावसाचं पाणी अखेर अंगाला लागलं या गोष्टीनेच मुंबईकर सुखावले आहेत. त्याचेच हे काही सुंदर क्षण टिपले आहेत अरुण पाटील यांनी...



आपल्याकडे छत्री असतानाही मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या छत्रीतून एकत्र जाण्याची मजाच वेगळी! असे क्षण काॅलेजजीवनातच अनुभवता येतात. आज सकाळी काॅलेजला जाणारी काही तरुण मुलं-मुली एकाच छत्रीतून जाताना दिसली.



अचानक आलेल्या पावसात छत्री नसल्याने प्लास्टिक, पुठ्ठा वापरत लोकांनी पाण्यापासूम आपला बचाव केला.




त्यामुळे मुंबईतला पाऊस हा कायम लोकांची त्रेधा तिरपीट करायला येतो, असं म्हणायला हरकत नाही.



मुंबईच्या भिजलेल्या रस्त्यांवरुन धावणार्‍या गाड्या स्वच्छ धुवून निघाल्या.

पावसाने शेवटी मुंबईकरांना आपलं आगमन झाल्याचं कळवलं आहे, त्यामुळे मुंबईकरांना आता पावसाळा असेपर्यंत कायम छत्री सोबत ठेवावी लागणार आहे. हा पाऊस असाच बरसत राहावा आणि कोकणात चिंतेत असलेल्या शेतकर्‍यांनादेखील त्याने लवकरात लवकर आनंद द्यावा, हीच वरुणराजाकडे प्रार्थना!



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९