Rain of Mumbai : मुंबईकरांनो... आता छत्री घेऊनच घराबाहेर पडा!

  303

मुंबई : काय हा पाऊस, नुसती रिपरिप लावली आहे!, धड पडतही नाही आणि धड थांबतही नाही, उगाच रस्त्यावर चिखल करुन ठेवलाय, या पावसाला पडायचंच होतं तर नीट पडायचं ना! आज छत्री घेऊ की नको? असं म्हणणार्‍या मुंबईकरांवर शेवटी छत्री घेऊनच घराबाहेर पडायची वेळ आली आहे, असं म्हणावं लागेल. इतके दिवस हुलकावणी देणारा पाऊस आज चांगला तासभर पडला. त्यामुळे छत्री न आणलेल्यांची मुंबईच्या रस्त्यांवर चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.


तसं मुंबईकरांच्या नशिबी कायम पाऊस हुलकावणीच देऊन जातो. पण यंदा पावसाने जरा आणखी उशीर केला. असं असलं तरी पावसाची मजा मात्र कायम आहे. आज पाऊस पडल्यामुळे लोकलही काहीशा उशिरा धावत होत्या. त्यामुळे कामाला जायला उशीर झालेला असला तरी पावसाचं पाणी अखेर अंगाला लागलं या गोष्टीनेच मुंबईकर सुखावले आहेत. त्याचेच हे काही सुंदर क्षण टिपले आहेत अरुण पाटील यांनी...



आपल्याकडे छत्री असतानाही मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या छत्रीतून एकत्र जाण्याची मजाच वेगळी! असे क्षण काॅलेजजीवनातच अनुभवता येतात. आज सकाळी काॅलेजला जाणारी काही तरुण मुलं-मुली एकाच छत्रीतून जाताना दिसली.



अचानक आलेल्या पावसात छत्री नसल्याने प्लास्टिक, पुठ्ठा वापरत लोकांनी पाण्यापासूम आपला बचाव केला.




त्यामुळे मुंबईतला पाऊस हा कायम लोकांची त्रेधा तिरपीट करायला येतो, असं म्हणायला हरकत नाही.



मुंबईच्या भिजलेल्या रस्त्यांवरुन धावणार्‍या गाड्या स्वच्छ धुवून निघाल्या.

पावसाने शेवटी मुंबईकरांना आपलं आगमन झाल्याचं कळवलं आहे, त्यामुळे मुंबईकरांना आता पावसाळा असेपर्यंत कायम छत्री सोबत ठेवावी लागणार आहे. हा पाऊस असाच बरसत राहावा आणि कोकणात चिंतेत असलेल्या शेतकर्‍यांनादेखील त्याने लवकरात लवकर आनंद द्यावा, हीच वरुणराजाकडे प्रार्थना!



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.