Rain of Mumbai : मुंबईकरांनो... आता छत्री घेऊनच घराबाहेर पडा!

मुंबई : काय हा पाऊस, नुसती रिपरिप लावली आहे!, धड पडतही नाही आणि धड थांबतही नाही, उगाच रस्त्यावर चिखल करुन ठेवलाय, या पावसाला पडायचंच होतं तर नीट पडायचं ना! आज छत्री घेऊ की नको? असं म्हणणार्‍या मुंबईकरांवर शेवटी छत्री घेऊनच घराबाहेर पडायची वेळ आली आहे, असं म्हणावं लागेल. इतके दिवस हुलकावणी देणारा पाऊस आज चांगला तासभर पडला. त्यामुळे छत्री न आणलेल्यांची मुंबईच्या रस्त्यांवर चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.


तसं मुंबईकरांच्या नशिबी कायम पाऊस हुलकावणीच देऊन जातो. पण यंदा पावसाने जरा आणखी उशीर केला. असं असलं तरी पावसाची मजा मात्र कायम आहे. आज पाऊस पडल्यामुळे लोकलही काहीशा उशिरा धावत होत्या. त्यामुळे कामाला जायला उशीर झालेला असला तरी पावसाचं पाणी अखेर अंगाला लागलं या गोष्टीनेच मुंबईकर सुखावले आहेत. त्याचेच हे काही सुंदर क्षण टिपले आहेत अरुण पाटील यांनी...



आपल्याकडे छत्री असतानाही मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या छत्रीतून एकत्र जाण्याची मजाच वेगळी! असे क्षण काॅलेजजीवनातच अनुभवता येतात. आज सकाळी काॅलेजला जाणारी काही तरुण मुलं-मुली एकाच छत्रीतून जाताना दिसली.



अचानक आलेल्या पावसात छत्री नसल्याने प्लास्टिक, पुठ्ठा वापरत लोकांनी पाण्यापासूम आपला बचाव केला.




त्यामुळे मुंबईतला पाऊस हा कायम लोकांची त्रेधा तिरपीट करायला येतो, असं म्हणायला हरकत नाही.



मुंबईच्या भिजलेल्या रस्त्यांवरुन धावणार्‍या गाड्या स्वच्छ धुवून निघाल्या.

पावसाने शेवटी मुंबईकरांना आपलं आगमन झाल्याचं कळवलं आहे, त्यामुळे मुंबईकरांना आता पावसाळा असेपर्यंत कायम छत्री सोबत ठेवावी लागणार आहे. हा पाऊस असाच बरसत राहावा आणि कोकणात चिंतेत असलेल्या शेतकर्‍यांनादेखील त्याने लवकरात लवकर आनंद द्यावा, हीच वरुणराजाकडे प्रार्थना!



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai Traffic AI Management System : आता मुंबईच्या ट्राफ‍िक मॅनेजमेंटसाठी होणार AI ची मदत

- मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती मुंबई : एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या ट्राफ‍िक

Chembur Accident : चेंबूरमध्ये भीषण अपघात; बांधकामाच्या ८व्या मजल्यावरून ६ कामगार खाली पडले

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन

Vijay Rashmika : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रश्मिका-विजयने दिली 'गुड न्यूज'; चाहत्यांना सुखद धक्का!

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन