ST : अखेर लाल परी साळाव पुलावरुन धावली!

  164

मुरूड : मुरूड-अलिबाग मार्गावरील साळाव पुलाच्या दुरुस्तीमुळे सुमारे दोन महिने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. या मार्गावर धावत असलेली लाल परी ही सुद्धा बंद केली होती. त्यामुळे असंख्य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते.


अखेरीस १४ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १२ टनाखालील वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. परंतु काही अपवादामुळे १४ जूनपासून लाल परी धावू शकली नाही. अखेरीस १३व्या दिवशी लालपरीला हिरवा कंदील दाखवला आणि २३ जून रोजी सायंकाळी सराव वाहतूक म्हणून मुरूड - रेवदंडा गाडी सोडली. त्यानंतर रात्री ११ वाजता मुरूड - मुंबई एसटी सेवा सुरू केल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.


मुरूड अलिबाग मार्गावर पुन्हा एकदा साळाव पुलावरुन लाल परी धावू लागल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या पुलावरुन एसटी सेवा बंद केल्याचा मोठा फटका मुरूड एसटी आगाराला बसला होता. या आगाराचे उत्पन्न ६ लक्षावरुन २ लक्षावर आले होते. प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली