ST : अखेर लाल परी साळाव पुलावरुन धावली!

मुरूड : मुरूड-अलिबाग मार्गावरील साळाव पुलाच्या दुरुस्तीमुळे सुमारे दोन महिने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. या मार्गावर धावत असलेली लाल परी ही सुद्धा बंद केली होती. त्यामुळे असंख्य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते.


अखेरीस १४ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १२ टनाखालील वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. परंतु काही अपवादामुळे १४ जूनपासून लाल परी धावू शकली नाही. अखेरीस १३व्या दिवशी लालपरीला हिरवा कंदील दाखवला आणि २३ जून रोजी सायंकाळी सराव वाहतूक म्हणून मुरूड - रेवदंडा गाडी सोडली. त्यानंतर रात्री ११ वाजता मुरूड - मुंबई एसटी सेवा सुरू केल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.


मुरूड अलिबाग मार्गावर पुन्हा एकदा साळाव पुलावरुन लाल परी धावू लागल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या पुलावरुन एसटी सेवा बंद केल्याचा मोठा फटका मुरूड एसटी आगाराला बसला होता. या आगाराचे उत्पन्न ६ लक्षावरुन २ लक्षावर आले होते. प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

kajol : मी मारण्यापूर्वी..., अभिनेत्री काजोलच खळबळजनक वक्तव्य

kajol : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही प्रेक्षकांच्या मनावर आजही तेवढंच राज्य करते जेवढं ती आधी करत होती.

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे