Weather Update: आसाममध्ये पूरपरिस्थीती बिकट तर, महाराष्ट्रात पावसाची दांडी

गुवाहाटी: गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने आसामची परिस्थिती बिकट बनली आहे. ३१ पैकी १० जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. राज्यातील १.२ लाख लोकांना आपली घरे आणि जमीन सोडून छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. हवामान खात्याने अति मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन ऑरेंज अलर्ट दिला आहे. ब्रह्मपुत्रेची उपनदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.


दरम्यान, मान्सून तळकोकणातच अडकला असून त्याच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे. परंतु, सध्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत आज मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे.


तर, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड, तेलंगण येथे उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तसेच तामिळनाडू वगळता दक्षिण भारतात ६०% ते ८०% पावसाची कमतरता आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचा मध्य आणि पूर्व भागदेखील कोरडा आहे. या राज्यांमध्ये पावसाची तूट ८०%-९०% पर्यंत वाढली आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०