बंगळूर : हल्ली परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून कॉपी करण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी दहावी-बारावीच्या परिक्षेतही विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होण्यासाठी चुकीची पद्धत वापरल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारे २१ जानेवारी २०१९ रोजी कर्नाटक बोर्डाकडून ५४५ जागांसाठी घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या लेखी परिक्षेत काही परीक्षार्थीकडून बेकायदा कृती करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी आता पोलिस खात्याकडून त्या सर्व ५२ परीक्षार्थीना कायमस्वरूपी डिबार करण्यात आले आहे.
पोलिस उपनिरीक्षकांच्या या भरती परिक्षेत गैरवर्तन केलेल्या विद्यार्थ्यांना यापुढे कोणत्याही प्रकारच्या पोलिस खात्यातील परीक्षेत (Police Recruitment Exam) सहभागी होता येणार नाही, असा आदेश पोलिस महासंचालक कमल पंत आणि आर्थिक गुन्हे शाखा बंगळुरु यांनी जारी केला आहे.
पोलिस उपनिरीक्षक (नागरी) पदासाठी ५४५ पुरुष आणि महिला जागांसाठी भरतीचे आयोजन ३ ऑक्टोबरपासून करण्यात आले होते. सकाळी अकरापासून दुपारी साडेबारापर्यंत दोन टप्प्यात राज्यातील सात केंद्रामध्ये लेखी परीक्षा घेण्यात येत होती. याअंतर्गत बंगळूर, म्हैसूर, मंगळूर, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, तुमकूर जिल्हा आणि दावणगिरी जिल्हा अशा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या.
सीआयडीने (CID) हाती घेतलेल्या तपासात परीक्षार्थींनी लेखी परीक्षावेळी ब्लूटूथ (Bluetooth) आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा (Electronic device) उपयोग केल्याचे उघडकीस आले होते. त्याचबरोबर इतर परीक्षार्थींनी गैरमार्गातून ओएमआरसीट मिळवल्यामुळे लेखी परीक्षा बेकायदा ठरवली गेली होती. याप्रकरणी बंगळूर, गुलबर्गा, हुबळी-धारवाड, आणि तुमकुर शहरासह विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले व सीआयडीने तपास करून दोषारोप दाखल केला होता. यातील ५२ परीक्षार्थीना आता कायमस्वरूपी डिबार करण्यात आले आहे.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…