PSI exam : पोलीस उपनिरीक्षक भरती परिक्षेत ५२ परीक्षार्थी कायमस्वरूपी डिबार

२०१९ मध्ये घेण्यात आल्या होत्या परीक्षा


बंगळूर : हल्ली परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून कॉपी करण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी दहावी-बारावीच्या परिक्षेतही विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होण्यासाठी चुकीची पद्धत वापरल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारे २१ जानेवारी २०१९ रोजी कर्नाटक बोर्डाकडून ५४५ जागांसाठी घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या लेखी परिक्षेत काही परीक्षार्थीकडून बेकायदा कृती करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी आता पोलिस खात्याकडून त्या सर्व ५२ परीक्षार्थीना कायमस्वरूपी डिबार करण्यात आले आहे.


पोलिस उपनिरीक्षकांच्या या भरती परिक्षेत गैरवर्तन केलेल्या विद्यार्थ्यांना यापुढे कोणत्याही प्रकारच्या पोलिस खात्यातील परीक्षेत (Police Recruitment Exam) सहभागी होता येणार नाही, असा आदेश पोलिस महासंचालक कमल पंत आणि आर्थिक गुन्हे शाखा बंगळुरु यांनी जारी केला आहे.



नेमकं काय घडलं?

पोलिस उपनिरीक्षक (नागरी) पदासाठी ५४५ पुरुष आणि महिला जागांसाठी भरतीचे आयोजन ३ ऑक्टोबरपासून करण्यात आले होते. सकाळी अकरापासून दुपारी साडेबारापर्यंत दोन टप्प्यात राज्यातील सात केंद्रामध्ये लेखी परीक्षा घेण्यात येत होती. याअंतर्गत बंगळूर, म्हैसूर, मंगळूर, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, तुमकूर जिल्हा आणि दावणगिरी जिल्हा अशा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या.


सीआयडीने (CID) हाती घेतलेल्या तपासात परीक्षार्थींनी लेखी परीक्षावेळी ब्लूटूथ (Bluetooth) आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा (Electronic device) उपयोग केल्याचे उघडकीस आले होते. त्याचबरोबर इतर परीक्षार्थींनी गैरमार्गातून ओएमआरसीट मिळवल्यामुळे लेखी परीक्षा बेकायदा ठरवली गेली होती. याप्रकरणी बंगळूर, गुलबर्गा, हुबळी-धारवाड, आणि तुमकुर शहरासह विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले व सीआयडीने तपास करून दोषारोप दाखल केला होता. यातील ५२ परीक्षार्थीना आता कायमस्वरूपी डिबार करण्यात आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Comments
Add Comment

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा