Wari : तुकोबांच्या पालखीचे इंदापूरात दुसरे अश्व रिंगण

इंदापूर : राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी आहेत. लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत.


पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा आज इंदापूरमध्ये संपन्न झाला. तुकोबारायांच्या पालखीचा रथ मैदानात आल्यावर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून रथाचे स्वागत केले. त्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली. सर्वात आधी सर्व दिंड्यांचे पताकाधारी वारकरी रिंगणात धावले. मग बेलवडीप्रमाणे इंदापुरातही पोलिसांना रिंगणात धावण्याचा मान मिळाला. त्यानंतर डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आनंदाने धावल्या. सर्वात शेवटी महाराजांचा अश्व आणि स्वाराच्या अश्वाने दौड घेऊन हा सोहळा आणखी नयनरम्य केला. इंदापूर परिसरातील शेकडो नागरिकांनी रिंगण सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.


संत तुकाराम महाराजांच्या पालखीने सकाळी अकराच्या सुमारास इंदापूर गाठले. इंदापुरात रयत शिक्षण संस्थेच्या कदम विद्यालय प्रांगणावर रांगोळ्या काढून तुकोबारायांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. तिथे मंडप उभारून रिंगणाची तयारी आधीच करण्यात आली होती.


तुकाराम महाराजांचा आजचा मुक्काम इंदापूरमध्ये असणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम बरड येथे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज फलटणहून बरडकडे प्रस्थान ठेवले. यावेळी फलटणवासियांनी पाणावलेल्या डोळ्यांनी पालखीला निरोप दिला. अनेक फलटणवासियांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. अनेकांनी वारकऱ्यांची सेवा केली. वारकऱ्यांचा पाहुणचार केला. कुटुंबियांप्रमाणे त्यांचे स्वागत केले. त्यानंतर रात्री वारकऱ्यांनी अनेक ठिकाणी भजने केली आणि पुन्हा एकदा पंढरीच्या वाटेकडे रवाना झाले. सगळ्या वारकऱ्यांना आता विठुरायाची आस लागली आहे. सगळेच वारकरी पंढरीच्या वाटेने विठुनामाचा गजर करत एक एक पाऊल टाकत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे