Devendra Fadanvis's counter attack : उद्धव ठाकरे घोडा हाकत होते की बैलबंडी?

  130

लसीच्या राजकारणावरुन देवेंद्र फडणवीसांचा पलटवार


कराड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी (Narendra Modi) लस तयार केली, या वक्तव्यावर राजकारण तापल्याचे चित्र आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस व उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात वार-पलटवार सुरु आहेत. आज कराड येथे झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले. 'मोदींनी या देशामध्ये कोरोनोची लस (Corona vaccine) तयार केली, असं मी म्हटलं, तर उद्धवजींना ते फार झोंबलं. मग उद्धवजी रोज सांगायचे मी राज्य चालवतो तेव्हा ते काय घोडा हाकत होते की बैलबंडी?' अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी तर म्हणेन होय मोदींनी लस तयार केली. त्याचं कारण असं की जगात पाच देश लस तयार करु शकले. त्यात मोदींच्या संबंधामुळे आपल्याला रॉ मटेरियल (Raw Material) मिळालं. मोदी यांनीच लस तयार केली, कारण जे शास्त्रज्ञ लस तयार करत होते त्यांच्याकडे जाऊन मोदीजींनी त्यांना १८०० कोटी रुपये दिले. त्यामुळे कोरोनाची लस तयार झाली. त्यानंतर मोदीजींनी भारतातील १४० कोटी लोकांना साडेसतरा कोटी मोफत लसी देण्याचे काम केले.


पुढे ते म्हणाले, कोरोनाची लस मोदींनी दिली नसती तर आपण इथं बसू शकलो असतो का? आपण अमेरिका आणि रशियापुढे कटोरा घेऊन उभे राहिलो असतो आणि आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या असं म्हटलं असतं. त्या देशांनी आपल्याला थांबा, आधी आमच्या लोकांना देतो, असं म्हटलं असतं. परिणामी आपल्या देशात प्रेतांचा खच पडला असता. पण या देशाला दूरदर्शी पंतप्रधान मिळाले. त्यांनी हिंमतीने कोरोनाचा सामना केला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक