Solstice: आज सुर्य उशीरा मावळणार! कारण?

मुंबई: आज २१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस (World Longest Day) असतो. या दिवशी दक्षिणायन (Summer Solstice) सुरु होतं. उत्तरायण (Winter Solstice) आणि दक्षिणायन या दोन स्थिती आहेत. सूर्याची उगवण्याची स्थिती दिवसेंदिवस दक्षिणेकडे झुकण्याच्या क्रियेला दक्षिणायन असं म्हटलं जातं.


पृथ्वी ३६५ दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. मात्र पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष हा २३.५ अंशात कललेला आहे. पृथ्वी २३.५ अंशात एका बाजूला कललेली आहे आणि त्याच स्थितीत ती सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी पृथ्वीचा उत्तर ध्रुवाचा भाग आणि दक्षिण ध्रुवाचा भाग सूर्याच्या जवळ येतो. त्यामुळे दर सहा महिन्यांच्या अंतराने दोन दिवशी सूर्य आणि पृथ्वीचे अंतर सारखेच असते.


उत्तरायण आणि दक्षिणायन यांचा कालावधी सहा महिने असतो. २१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. दक्षिणायन सुरु झाल्यानंतर दिवस छोटा होऊ लागतो तर रात्र मोठी होऊ लागते. तर उत्तरायण सुरु झाल्यानंतर दिवस मोठा आणि रात्र छोटी होऊ लागते. दक्षिणायन लागल्यानंतर आषाढी एकादशी येते. या एकादशीलाच देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. या काळात मुंज, लग्न अशी शुभ कार्य केली जात नाहीत. मात्र विविध व्रत वैकल्यं, उपास, तीर्थयात्रा आणि दान धर्म केले जातात अशी श्रद्धा आहे.

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी