Megh Malhar : बळीराजाने मेघ मल्हार आळवून केला वरुण देवाचा धावा

  530

Megh Malhar : मृगाने दाखवल्या वाकुल्या, आर्द्राकडे नजरा खिळल्या


त्र्यंबकेश्वर : गेल्या आठ जून पासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने नाशिक जिल्ह्यात चिंतेचे ढग निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. काही वर्षांपूर्वी रोहिणी आणि मृग नक्षत्रात सरासरी पर्जन्य वृष्टी होत असल्याने या दिवसांत मशागत पूर्ण होऊन पेरणीची तयारी सुरु होत होती. तथापी, यंदा रोहिणी आणि मृग दोन्ही नक्षत्रांनी वाकुल्या दाखवल्याने मशागतही लांबली आणि पेरण्याही खोळंबल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.


त्र्यंबकेश्वर तालुक्यात मे, जून महिन्यात सरासरी १७० मिमी पाऊस पडतो. यावर्षी अवघा ३० मिमी पाऊस पडला आहे. आता २२ जून पासून सुरु होणाऱ्या आर्द्रा नक्षत्राचा तरी पाऊस पडेल का, यावर गावागावात, पारांपारांवर चर्चा सुरु झाली आहे. मृग नक्षत्र कोरडे गेले की आर्द्रात पाऊस पडतो, असे मतही काही अनुभवी जाणकार मंडळी मांडू लागल्याने दोन - तीन दिवसांत पाऊस पडण्याची आशा पल्लवीत झाली आहे. त्यातच हवामान खात्याने शुक्रवारी पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तविल्याने आशेला धुमारे फुटत आहेत.



Megh Malhar : वरुण देवाची याचना...


पाऊस उशिरा येण्याची चिन्हे दिसू लागली की काही पूर्वापार उपाय योजना अंमलात आणण्याची प्रथा आजही ग्रामीण भागातून पहायला मिळते. नाशिक जिल्ह्यात देखील अनेक गावांमधून या जुन्या चालीरितींचा आधार घेण्यास सुरुवात झाली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्रंबकेश्वर मधील पवित्र कुंड कुशावर्त तीर्थात चिंतामणी सूमुहूर्तावर लवकरच विधान करून ठेवण्यात येणार आहे. तर एका जुन्या धार्मिक बाडात सापडलेल्या ग्रंथात पाऊस पडावा म्हणून काही वर्षांपूर्वी लिहून ठेवलेला प्रार्थना मंत्र पठण करण्याचा विचार पुढे आला आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने वरुण देवाची आराधना करावी आणि लांबलेले पर्जन्यमान बोलवावे अशी धारणा प्रत्यक्षात आणण्याची मानसिकता अधोरेखित होऊ लागली आहे.



Megh Malhar : मेघ मल्हारची आळवणी...



  • पाऊस का पडत नाही, याविषयी आत्मपरीक्षणही सुरु झाले असून शासनाने आतापासूनच कृत्रिम पाऊस पाडण्या बाबत विचार करणे गरजेचे असल्याचे मत देखील व्यक्त होत आहे. ‘मेघ मल्हार’ हा राग आळवला की पाऊस पडतो, अशी एक धारणा आहे.

  • ‘तानसेन’ नावाच्या चित्रपटात सहगलसाठी ताना-रीरी या दोन बहिणी पाऊस पडावा म्हणून मल्हार गातात असे दृश्य चित्रीत आहे. त्या दृश्याने ही धारणा आणखी पक्व झाल्याने अनेकांना पर्जन्य राजाला बोलावण्यासाठी मेघ मल्हार आळवण्याचीही आठवण होऊ लागली आहे.

  • एकूणच नाशिक जिल्हा पावसासाठी आतुर झाला असून विविध मार्गांचा अवलंब करून पाऊस पडावा असेच प्रयत्न जिल्ह्यात सर्वदूर सुरु आहेत.


Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

US Russia curde: खळबळजनक! भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत युएस ५००% टेरिफ लावणार?

प्रतिनिधी: खळबळजनक! युएस सिनेटमध्ये रशियाकडून कच्चे तेल विकत घेत असलेल्या राष्ट्रांवर ५०० टक्के कच्चे तेल

Devendra Fadanvis : भोंग्याच्या मुद्द्यावरून सभागृहात फडणवीसांचं कौतुक, अनिल पाटील म्हणाले, सकाळी १०च्या भोंग्याचं काय करायचं? मुख्यमंत्र्यांचं मिश्किल उत्तर!

मुंबई : राज्यात काही काळाआधी मशिदींवरील भोंग्यांवरून मोठं राजकारण पेटलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)

मिठी नदी गाळ घोटाळा: सामंत आक्रमक, 'दोषींना सोडणार नाही, 'अदृश्य शक्तीं'चाही तपास!'

मुंबई: मिठी नदीतील गाळ उपसा आणि स्वच्छतेच्या नावाखाली झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्याची सखोल चौकशी

Tesla India: खुशखबर! अखेरीस टेस्लाचा अलभ्यलाभ ! १५ जुलैला टेस्लाचे शोरूम भारतात 'या' ठिकाणी येणार !

प्रतिनिधी: नव्या भारतातील आणखी एक पुरावा म्हणजे भारतात १५ जुलैला 'टेसला' (Tesla) आपले प्रथम शोरूम मुंबईत उघडणार आहे.

Sanjay Shirsath : पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट, संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ

मुंबई : महायुतीचे मंत्री संजय शिरसाट यांच्या एका व्हायरल व्हिडिओने सगळीकडेच खळबळ माजली आहे. नुकतीच मंत्री संजय

इनाम उल हक आणि राधिकाचं एकत्र फिरणंच ठरलं तिच्या हत्येचं कारण ?

गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्राममध्ये राहणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर टेनिसपटू म्हणून प्रगती करत असलेल्या आणि