ahmedabad rath yatra: अहमदाबादमध्ये रथ यात्रेदरम्यान दुर्घटना!

अहमदाबाद: अहमदाबादमधील दरियापूर कडियानाका रस्त्यावर मंगळवारी एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा काही भाग रथयात्रा पाहण्यासाठी उभे असलेल्या लोकांवर कोसळल्याची घटना घडली आहे. यात एका युवकाचा मृत्यू झाला. तर ३ मुलांसह १० जण जखमी झाले आहेत. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


अहमदाबादच्या जमालपूर येथील भगवान जगन्नाथ मंदिरापासून सकाळी ७.४० वाजता रथयात्रेला सुरुवात झाली. तिन्ही रथ सायंकाळी पाच वाजता दरियापूरला पोहोचले. येथे तीनही रथ एका मंदिराजवळ सुमारे १५ मिनिटे थांबले. पूजा करून कडिया नाक्याकडे रवाना झाले. त्यावेळी कडियानाका परिसरात हा अपघात झाला.


या अपघातामागे अहमदाबाद महापालिकेचा निष्काळजीपणाही समोर आला आहे. रथयात्रा मार्गावरील सर्व धोकादायक व जीर्ण घरांना नोटीस देण्यात येणार होती. मात्र चौकशी करूनही या घराला नोटीस बजावण्यात आली नाही. त्याचवेळी जखमींना रुग्णालयात नेले जात असताना महापालिकेचे पथक नोटीस घेऊन घरी पोहोचले.

Comments
Add Comment

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.